Thursday, October 21, 2010

(30) स्वामींचा नरसिंह अवतार

कुलकर्णी नावाच्या एका गृहस्थाला सावकाराचे फार कर्ज झाले होते.शेतातलं सर्व धान्य देउन सुद्धा जेम-तेम
कर्जाचं व्याज निघत होतं.कुलकर्ण्यांची आरती नावाची मुलगी स्वामींची निस्सीम
भक्त होती.एकदा देऊळात जातांना कुलकरण्यांना काटा रुततो, तितक्यात सावकार तिथे
येऊन, त्यांना नाही-नाही ते बोलतो, त्यांना देव-मार्गाहून परावृत्त करतो.
जाता-जाता सावकाराला धनाची  पिशवी सापडते.
कुलकर्णी मनात म्हणतात-"देवा ! हा काय तुझा न्याय आहे? तुझी नियमांनी भक्ती करणाऱ्यांच्या पायात तु काटा
रुतवतो, आणी सावकारासारख्या उन्मत्त लोकांना धन देतो !"
व्याज न मिळाल्या मुळे सावकार ,कुलकर्ण्यांच्या घरी येऊन सर्व धान्यांचे पोते उचलवतो.
तेव्हा आरती व त्याचा विवाद होतो.
कुलकर्णी आरतीच्या वतीनी क्षमा मागतो.
कामांध सावकार आरती ला आपल्या घरी एक दिवसा साठी पाठवायच्या अटीवर
पूर्ण कर्जमाफीचं लालूच देतो.
आरती संतापून म्हणते-"स्वामींच्या भक्तांना छळणाऱ्यांना स्वामी कधीच क्षमा करणार नाही."
सावकार, 'उद्याच तुझ्या घरा-दारावर जब्ती आणतो' अशी धमकी देउन जातो.
व्याज फेडायला आरती आपल्या लग्ना साठी जमवलेलं धन जमीनीतुन उरकुन काढते,
तितक्यात सावकारालचा पाठवलेला गुंड 'परश्या ' येऊन धन हिसकवुन घेतो.
आणी आरतीला उचलून सावकाराकडे न्यायला लागतो.तितक्यात स्वामी येतात.
स्वामी म्हणतात:-" परश्या........! ठेव तिला खाली..!"
परश्या नकार देतो.
स्वामी त्याला रोखून बघतात, स्वामींच्या तीक्ष्ण दृष्टी मुळे परश्या आरतीला खाली ठेवतो.
स्वामी म्हणतात:-"परश्या ! एवढे पापं तु फेडशील कुठे?"
"अरे यांचे फळ भोगावेच लागेल!"
अज्ञ परश्या म्हणतो:- "का? काय होणार मला? मला काहीही होणार नाही."
स्वामी म्हणतात-"असं! मग चल आमच्या बरोबर. आम्ही दाखवतो काय होणार ते!"
स्वामी परश्या ला घेऊन अंतर्ध्यान होतात.
स्वामी आणी परश्या एका जागेवर येऊन पोचतात.
तिथे एक हाथ-पायांनी लाचार माणूस जमिनीवर पडलेला असतो, त्याला नीट बोलता सुद्धा
येत नसतं.
लोकं जनावरांना अन्न देतात पण त्याला देत नाही, शेवटी जनावरांनी सांडलेलं अन्न तो वेचून खातो.
स्वामी म्हणतात-'ओळख याला! हा कोण आहे?"
परश्या म्हणतो- "अरे बाप रे ! हा तर मीच आहे."
स्वामी म्हणतात-"अरे अशे गोर-गरिबांवर अत्याचार करणार तर असाच जानवराहुन वाईट जन्म येईल.
परश्या- " माझ चुकलं, पण आता मी काय करू?" "स्वामी मला या अवस्थेपासून वाचवा...!"
स्वामी म्हणतात:-" अरे पापं करणं फार सोपं असतं पण निस्तरणं तेवढंच कठिण."
"अजून ही काही हाता बाहेर गेलेलं नाही आहे."
"उरलेलं आयुष्य ईश्वराच्या  नामस्मरणात घाल,आणी आपले पापं नष्ट कर."
"अरे देवाच्या नामात फार मोठ्ठी ताकद असते."
"वाल्याचा वाल्मीकी झालं आहे,हे विसरू नको, मात्र प्रयत्न तेवढेच सचोटीचे असायला हवे."

" आणखी नवीन पापं करू नको, सत्कर्म कर, अडलेल्या-नडलेल्यांची मदत कर."
परश्या होकार देतो, आणी कुलकर्ण्यांचं धन परत करतो.
पाहिलं सत्कर्म म्हणुन सावकाराला समझ देतो, पण सावकार काही दुमानत नाही.
सावकार  कुलकर्ण्यांच्या घरावर जब्ती आणतो, सर्व कुलकर्णी घरा बाहेर हकलले जातात.
सावकार आरतीला हिणवतो_"कुठे आहे तुझा स्वामी? आता का नाही आला ?"
 "भक्त संकटात असले तरी कुठे आहे?"
डोक्यावर इतक मोठं संकट असतांना सुद्धा आरती ठाम पणे म्हणते -"स्वामी चरा-चरात व्याप्त आहे,
ते नक्कीच आमच्या मदतीस धावून येईल."
सावकार थट्टा करतो-" स्वामी आत् घरात तर दडून नाही बसले ना? आत्ता जाऊन बघतो."
सावकार घरात प्रवेश करतो, तोआत गेल्या बरोबर दार आपोआप बंद होतं.
एक कडक आवाज ऐकू येते-" आम्हाला पाह्यला आला ना रे, सावकार!"
सावकार दचकतो, आवाजाच्या दिशेला जाऊन बघतो तर काय .
साक्षात  नरसिंह समोर उभे असतात, सिंह मुख, हाताचे तीक्ष्ण नखं, हृदयाला ठोके पडेल अश्या व्याघ्रं डरकाळ्या.
सावकाराची तर घाबरगुंडीच उडते.
तो  नरसिंहदेव म्हणुन पाया पडतो.
नरसिंह म्हणतात-" अरे आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीवर आपली वाईट नजर टाकतो."
"गोर-गरिबांना छळतो त्यांच्यावर अत्याचार करतो, अरे अडलेल्या-नडलेल्यांची मदत करण तर दुर
त्याचं असलेलं-नसलेलं सुद्धा हिरावुन घेतो."
सावकार शरणागती पत्करतो.
नरसिंहांच्या जागी स्वामी दिसतात. सावकार स्वामींची क्षमा मागतो.
स्वामी आरतीला हाक मारतात- " आरती.......! आम्हाला हाक मारत होती ना ? बघ आम्ही तुझ्या घरी आलो आहे!"
सर्व कुलकर्णी घरात प्रवेश करतात.
स्वामी म्हणतात-" आरती , तुझ्या निस्सीम भक्तीमुळे आम्हाला यावं लागलं ,अरे डोक्यावर इतकं मोठ
संकट असतांनाहीतुझ्या अनन्य भक्तीत लेशमात्र ही अंतर  आलं नाही."
"आम्हाला तर येणं भागच होत."
"अरे जेव्हा-जेव्हा हिरण्यकश्यपु जन्म घेणार तेव्हा-तेव्हा आम्ही कोणाच्या न कोणच्या रुपात भक्ताच्या रक्षणा करता
प्रगट होणार."
सावकार कुलकरण्यांचं कर्ज माफ करुन क्षमा मागतो.
स्वामी म्हणतात-" कुलकरण्या तुझ्या मनात शंका होती ना ,कि देव अन्याय करणाऱ्यांना मदत करतो, आणी
सज्जनाला त्रास का देतो?
कुलकर्णी ओशालातात.
स्वामी म्हणतात-"अरे तुम्ही सर्व फक्त याच जन्माचा विचार करतात,
अरे मनुष्याला आपल्या मागच्या सर्व जन्मांचे कर्म भोगावे लागतात."
"भगवंत कधीही अन्यायी नसतो."
"कुलकर्णी गहिवरून होकार देतात."

No comments:

Post a Comment