Saturday, October 2, 2010

(8) स्वामींचा हनुमान

कुलकर्णी वकीलांची बायको निपुत्रीक असल्यानी दुखी होती. कुलकर्णी आपल्या बायकोसह अक्कलकोटला स्वामीस भेटायला जातात.

स्वामी त्यांना म्हणतात-" द्वारकानाथ को पुत्र चाहिये?" "पर हनुमान के सामने का अंधेरा हटावो?

जोडप्याला काही उमजत नाही पण स्वामी रागवेल म्हणून ते जास्त विचारत नाही.
सुंदराबाई त्यांचा कडून काही पैशे उकळून त्यांना गावातल्या सर्व हनुमान मंदिरात रोशनाई करायला सांगतात.
सर्व हनुमान मंदिरात उजेड करून ते स्वामी कडे परततात.
कुलकर्णी म्हणतात -" स्वामी ! आम्ही सर्व हनुमान मंदिरात रोशनाई केली .
स्वामी म्हणतात -" पर हमारा हनुमान तो अभी भी अंधेरे में हैं ?
कुलकर्णी जोडपं परत सर्व हनुमान मंदिर तपासायला जातात.
एका मंदिरात त्यांना कीर्तनकार बुवा मारुतीवर कीर्तन करताना भेटतात.त्यावरून त्यांना विचार येतो कि स्वामींचा हनुमान, म्हणझे स्वामींचा सर्वश्रेष्ट भक्त असावा.त्यांना वाटतं कि तो भक्त चोळप्पा असावा. चोळप्पा म्हणतात हा मान माझा नाही.
नंतर ते बाळप्पा कडे जातात.बाळप्पा पण प्रांजळपणे आपण स्वामींचा हनुमान नाही अस सांगतात.
नंतर बाळप्पा जोडप्याला मुरालीधरांच्या मंदिरात घेवून जातात. तिथे एक पाठमोऱ्या बसलेल्या व्यक्तीला स्वामीसुत म्हणून परिचय देतात.
स्वामी पुन्हा म्हणतात -" हमारा हनुमान अभी भी अंधेरे में है!"
चोळप्पा स्वामींना सूचना देतो कि बाळप्पा द्वारकानाथ यांना मुरलीधरांच्या मंदिरात घेवून गेले आहे.
इकडे बाळप्पा द्वारकानाथ यांना स्वामी सुतांची गोष्ट सांगतात.
स्वामीसुत यांचे पूर्वाश्रमी चे नाव हरीभाऊ ,ते जातींनी मराठा होते. मुंबई मध्ये ते नगर निगम मध्ये नौकरी करायचे.
नोकरी बरोबर हरीभाऊ व मित्र गजानन यांनी दोघांनी मिळून व्यापार सुरु केला, पण व्यापार बुडाला.
दोघे आपल्या परस्पर मित्र लक्ष्मण पंडित यांच्या कडे मदत मागायला जातात. लक्ष्मण राव स्वताच कर्जात बुडाले होते.
त्यांनी स्वामी कडे नवस केलेला असतो कि ८ दिवसात कर्ज फिटलं तर स्वामींच्या भेटीला जाऊ.
लक्ष्मण राव, हरिभाऊ व गजानन यांच्या पण कर्जाची जवाबदारी घेतात.कर्ज देणारी पेढी चा मुनीम लक्ष्मण राव च्या घरी येतो .
लक्ष्मण राव, मुनीम पैसे मागायला आला असं समझून, आपण बाहेरगावी गेलो अशी खोटी बातमी आपली गड्या मार्फत मुनीमाला देतात.
मग तो मुनीम हरिभाऊ यांना भेटतो आणि चांगली बातमी सांगतो कि पंडितांना दुसर्या एका व्यापारात फार फायदा झाला आहे .व तो २००० रु हरिभाऊ ला देतो. इकडे लक्ष्मण लपून ऐकतात.
स्वामींनी कृपा केली म्हणून सर्वांना गहिवरून येतं.
सर्व अक्कलकोट ला जायला निघतात. अक्कलकोट ला गेल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही असं ठरवण्यात येतं.
अक्कलकोटला येवून,सर्व चोळप्पाला भेटतात.चोळप्पा तेव्हा स्वामीचं उष्टं ताठ ठेवायला बाहेर आलेले असतात.
हरिभाऊ श्रद्धेनी त्या ताटातलं अन्न खातात.त्यांचे दोन्ही मित्र खायला नकार देतात.
स्वामींशी भेट झाल्यावर स्वामी स्वत: होवून म्हणतात -व्यापार केला, तोटा झाला. आम्हाला नवस केला.
सर्व लोकं थक्क होतात.
हरिभाऊ पैश्याची थैली स्वामी समोर ठेवतात.
स्वामी थैली ला घेवून जा असं म्हणतात ,आणि हरी भाऊ ला म्हणतात -" आम्हाला सफेद सफेद घेवून ये"!
बाळप्पा सफेद चा अर्थ ,चांदीच्या पादुका आहे, असं सांगतात.
स्वामी म्हणतात -"कुळावर पाणी, सोड आमचा सुत हो."
हरीभाऊ मुंबईहुन चांदीच्या पादुका घेऊन अक्कलकोट ला परत येतात.
स्वामी सर्वाना एक एक श्लोक सांगतात, आणि लक्षात ठेवायला सांगतात.
हरी भाऊच्या एका मित्राला सांगतात: "इदमेव शिवं इदमेव शिवं इदमेव शिवं "
हरी भाऊ ला सांगतात; "गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा "
हरी भाऊ स्वामीला पादुका भेट करतात. स्वामी पादुका घालतात,आणि छान आहे असं म्हणतात.
स्वामी या पादुका घालून फेर फटका मारायला जातात.हरीभाऊ ना गहीवरून येतं . सेवेकरी पादुका घ्यायला करतात पण स्वामी त्यांना हात लावू देत नाही.स्वामी त्या पादुकांना आत्मलिंग म्हणायचे.
स्वामिनी तब्बल १४ दिवस पादुका घातल्या. १४ दिवशी स्वामी म्हणतात ,तू आमचा सुत आहे ,संसार त्याग कर.
मग स्वामी हरी भाऊ ला आज्ञा देतात. दरिया किनारी एक किल्ला बांध.
या पादुका मस्तकावर ठेव. आणि तीन उठा -बश्या काढ.
हरिभाऊ आनंदानी श्री स्वामी आज्ञा पालन करतात. मग स्वामी हरिभाऊ ला पादुका त्या किल्यात स्थापन करायला सांगतात.
रात्री अचानक स्वामी उठून म्हणतात.-"चल रे निकल जाव यहा से!
यहा मेरे बाल गोपाल सोये है.
साले निकल जा यहा से. चल........".
त्यानंतर एक वाईट शक्ती तिथून निघून जाते.

स्वामी मग हरीभाऊ ला भगवे वस्त्र देतात आणि म्हणतात, ये लो, आपला सगळा संसार बुडवून टाक.
हरी भाऊ कबुली देतात -"मी उद्या मुंबई ला जातो व संसार सोडतो ; आयुष्य आपल्याला समर्पित करतो,
माउली पदरात घ्या".
स्वामी म्हणतात -"तू आम्हाला माउली म्हटलं, तू आजपासून हरीभाऊ नाही तू आमचा सुत."
हरिभाऊ मुम्बई ला जावून संकल्प करून आपलं सर्वस्व सोडतात.
ही गोष्ट पत्नी ताराबाई ला आवडली नाही,ती विरोध करते, पण स्वामीसुत तीला जुमानत नाही.
ताराबाई चे भरपूर सोन्याचे दागिने विकले जावून ब्राह्मणांना दान करण्यात येतात. .पत्नी भारी विरोध करते पण स्वामीसुत ऎकत नाही.
मंगळसूत्र सुद्धा ठेवले जात नाही.

हा सर्व वृतांत ऐकून ,द्वारकानाथ म्हणतात- "भक्ती करावी तर स्वामीसुता सारखी! "
द्वारकानाथ त्या मंदिराला रोषणाई करतात.स्वामीसुतांना परिचय देतात.प्रणाम करून, सर्व वृतांत सांगतात.
रोषणाई पाहून स्वामीसूतांना दिवाळी सारखं वाटतं.
"स्वामी तुमचा मनोरथ पूर्ण करेल ", असं स्वामीसुत सांगतात .
स्वामी म्हणतात -"क्यो द्वारकानाथ भेटला का हनुमान ?"
"अब हमारा हनुमान उजाले में है !"
"जाओ,चणे लेकर आओ!"
"खडे मुह क्या देखता है ?"

द्वारकानाथ चणे घेऊन येतात .

स्वामी म्हणतात -"ये लो चणे खेलने नही खाने के लिये. ये हमारा प्रसाद है. तुझी मनोकामना पूर्ण होईल."

एक वर्षानंतर द्वारकानाथ आपल्या पुत्राला स्वामींच्या पायाशी घालायला येतात.

त्यांची पत्नी म्हणते-" स्वामी !आपले उपकार कधी विसरू शकत नही !"

स्वामी म्हणतात -"भगवंताला भक्ताची इच्छा पूर्ण करायला आनंद वाटतो पण भक्ताला पण त्यासाठी प्रयत्नाची जोड लावायला पाहिझे."

 

No comments:

Post a Comment