Saturday, October 2, 2010

(11) सूरदासाची इच्छापूर्ती


स्वामी सर्व भक्तांना एक खेळ खेळायला बोलावतात. खेळ असा कि सर्वांनी एक-एक करून डोळ्यावर पट्टी बांधायची,व दुसर्यांनी त्याला गोल-गोल फिरवायचं , व त्या अवस्थेतच त्यांनी स्वामींना हुडकून काढायचं.
सर्व प्रयत्न करतात पण कुणालाळी यश येत नाही. शेवटी चोळप्पा प्रयत्न करतात आणि स्वामींना बरोबर हुडकून काढतात. सर्वाना आश्चर्य होतं. स्वामी सांगतात कि चोळ्यानी आम्हाला मनाच्या डोळ्यांनी शोधलं.
जो जो आम्हाला मनांच्या डोळ्यांनी शोधेल,आम्ही त्याला प्राप्त होऊ.
एका जन्मांध इसमाला श्रीकृष्णाच्या दर्शनाचा लळा होता. आपण अंध असल्यानी कृष्ण दर्शन करू शकत नाही,याचा त्याला खंत होता.
मथुरेला गेलो तर कृष्ण दर्शन होईल,पण मथुरेला जायला पैशे नाही म्हणून तो बाहेर पडतो.
मंदिरात प्रबोधनकार त्याची समझूत घालतात,कि अंध व्यक्तीला कुठेही कृष्ण दर्शन होऊ शकत नाही.
इकडे स्वामी मधुर बासरी वाजवतात.सर्व तल्लीन होतात.
चोळप्पाच्या प्रश्नावर स्वामी सांगतात कि आम्ही आमच्या भक्ताला बोलवायला बासरी वाजवत आहे.
इकडे ,सूरदासाची पत्नी निराश परतलेल्या आपल्या पतीला अक्कलकोटला जायचं सुचवते.
सूरदासाच्या मनाची तैयारी नसते म्हणून स्वामी स्वत: साधूचा रूप घेऊन भिक्षा मागायला येतात.
स्वामी भिक्षा ग्रहण करून, मथुरेच्या कृष्णाला, तुझी भिक्षा पोचली असं सांगतात.
मथुरेचा उल्लेख ऐकून सूरदास आपला मनोगत सांगतो.
स्वामी त्या दोघांना मथुरेला यायला तयार करतात.अक्कलकोटला पोचल्यावर स्वामी अदृश्य होतात.
सूरदास व त्याची पत्नी चकित होतात,त्यानां काही पण उमजत नाही, म्हणून ते सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी स्वामी कडे जायचं ठरवतात.
स्वामी सुरादासाला प्रेमानी जवळ बोलवतात.
स्वामी त्याच्यावर ध्यान केंद्रित करतात,सुरदासाला दृष्टी येते ,स्वामीच्या जागी त्याला मुरलीधर ,पिताम्बरधारी श्रीकृष्णाचे दर्शन होतात.
तो म्हणतो-"स्वामी, तुम्ही दत्ताचे पूर्णावतार आहे.माझ्यावर एक कृपा आणखी करा ,मला जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त करा.
स्वामी आशीर्वाद देतात -"तू जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होऊन ब्रह्मज्ञानी होईल."
बोध:मनांच्या डोळ्यांनी पहाणाऱ्यांना गुरु दर्शन होतचं.

No comments:

Post a Comment