Saturday, October 2, 2010

(18) स्वामींची युक्ती

स्वामीशिष्य नरसिंहस्वामी, स्वामींशी संबोधन करतात. धर्मप्रचार करतांना सामोरे जातांना येणाऱ्या अडचणी सांगतात.
स्वामी सांगतात-"हे कार्य करणे इतक सोपं नसतं,कधी फुलं तर कधी अंगारे प्राप्त होतात."
स्वामी, नरसिंह स्वामींना प्रेम आणि आपुलकीनी जनसामान्याला समझवत जा,असं सांगतात.
तिकडे,अप्पा आणि अण्णा नावाचे दोन भाऊ नरसिंहस्वामींच्या आगमनाची वाट पाहत असतात.
नरसिंहस्वामी आल्यावर त्यांची पाद्यपूजा,आरती करण्यात येते.
नरसिंहस्वामी दोन्ही भावांच्या वेदज्ञान, संतवांग्मय ज्ञान व इतर गोष्टी बद्दल कौतुक करतात.दोन्ही भावांवर समाज प्रबोधनाची
जवाबदारी दिलेली असते.
थोड्या वेळानी नरसिंहस्वामीला एका खोलीत घुंघरं आणि अत्तराच्या बाटल्या दिसतात,त्यांना लगेचच कळतं कि दोन्ही भावांनी पुन्हा लावणी कार्यक्रमाला
जाणे सुरु केले आहे.
नरसिंहस्वामी त्या बद्दल दोघा भावांची चांगलीच हाजिरी घेतात.
दोन्ही भाऊ सुद्धा पुन्हा लावणीच्या कार्यक्रमाला जाणार नाही असा शब्द देतात. नरसिंहस्वामी ताबडतोब तिथून निघतात.
संध्या काळी अप्पा आणि अण्णा चे मित्र येतात, त्यांच्या सांगण्या मूळे मनोनिग्रहाला तडा जातो.
दोन्ही भाऊ आज शेवटच्या वेळेला लावणी कार्यक्रमाल जाऊ,असं ठरवतात.

पण जशी जित्याची खोड मोडत नाही,तशी त्यांची लावण्या पाहायची सवय जात नाही.
नरसिंहस्वामीच्या उपायांना काहीही केल्या दाद मिळत नाही.
स्वामी,नरसिंहस्वामीना मानसिक संदेशांनी सुचवतात कि हे कार्य सोपे नाही,शिष्य चुकणारच,पण गुरुनी सतर्क राहून त्याचा सांभाळ करावा.

स्वामीकडे मीराबाई नावाची एक रूपस स्त्री भेटायला येते,तिला स्वामीनीच बोलावले असते.
ती आदरांनी स्वामींना नमस्कार करते,स्वामी तिला एक कामगिरी सोपवतात, मीराबाई त्यासाठी हामी भरते.
तिकडे अप्पा आणि अण्णांना सूचना मिळते कि गावात मीराबाई नावाची एक उत्तम पैकी लावणी कलावंत आली आहे.तिला भेटायला ते जातात,
तिथे पाहताच तर काय!
नरसिंहस्वामी तिथे आसनस्थ बसलेले दिसतात.
त्यांना आश्चर्य होत कि नरसिंहस्वामी इथे काय करत आहे.
नरसिंहस्वामी सांगतात कि मीराबाई त्यांची शिष्या आहे.
अप्पा-अण्णा बुचकाळ्यात पडतात आणि म्हणतात-कि मीराबाई सारखी नाचणारी-गाणारी बाई तुमची शिष्या कशी होऊ शकते?
नरसिंहस्वामी म्हणतात-" का जर खोटं बोलणारी, गुरुचा आदर न करणारी माणसे जर माझी शिष्य होऊ शकतात तर मीराबाई सारखी
कलावंत का शिष्या होऊ शकत नाही.
अप्पा-अण्णा ओशाळतात.
नंतर प्रामाणिक कबुली देतात कि ते तिला भेटायला आले होते.
नरसिंहस्वामी सांगतात कि मीराबाईची एक नियम आहे कि मी ज्याला अनुमती देतो तोच तिची कला पाहू शकतो.
तुम्हाला जर नृत्य पहायचं असेल तर लावणीच्या चाली वर रोज ज्ञानेश्वरी चा एक अध्याय वाचायचा. या प्रकारे ७ दिवसात ७ अध्याय वाचायचे.
इकडे बाळप्पा बरोबर चालतांना स्वामीच्या पायात ७ काटे रुततात, बाळप्पा खूप विनवणी करतात तरी स्वामी काटे काढू देत नाही.
स्वामी म्हणतात-: "गुरु चा मार्ग असाच असतो.निघेल ते काटे आपोआप !"
दोन्ही भाऊ पारायणाला बसतात,पण लावणीच्या चाली वर ज्ञानेश्वरी पाठ काही जमत नाही.तरी नरसिंह स्वामींची आज्ञा म्हणून प्रयत्न करतात.
पहिला अध्याय वाचल्या वर नरसिंह स्वामीं लावणी पाहायची आज्ञा देतात,पण जातांना त्यांना उत्साह वाटत नाही.
इकडे स्वामी समर्थ आपल्या पायातून पहिला काटा काढतात.
पाचव्या दिवशी अध्याय झाल्यावर त्यांना घरा बाहेरच जावं अस वाटत नाही. घरीच बसून नामस्मरण करावे असं वाटतं.
स्वामीच्या पायातला पाचवा काटा निघतो.
सातवा अध्याय झाल्यावर त्यांना लावणीच्या कार्यक्रमाला जायचा सुद्धा तिटकारा येतो.
तिकडे स्वामी सातवा काटा काढतात,व म्हणतात या दोघांचे जीवन आता निष्कंटक होवून अध्यात्माला समर्पित झाले आहे.
८ वा अध्याय वाचतांना नरसिंह स्वामी येतात,आणि विचारतात लावणीला का नाही गेले?
दोन्ही भाऊ उत्तर देतात कि त्यांना आता लावणीला जावे असं वाटत नाही.लावणीत आता रस वाटत नाही,आता कधीच जाणार नाही.
नरसिंह स्वामीं म्हणतात,याचं श्रेय स्वामींना जातं ,शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली.
नरसिंह स्वामीं,अप्पा-अण्णा सोबत स्वामींच्या दर्शनाला येतात.
स्वामी विचारतात-"काय आता लावणीचा विसर पडला का?"
"अरे धर्मप्रचार करणारे शूर शिपाई तुम्ही,तुम्ही अश्या व्यसनात पडाल तर कसं चालेल?"

"कोणतीही सवयीचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रुपांतर व्यसनात होतं."
"व्यसन हे अध्यात्म प्रगतीच्या मार्गात मोठी बाधा आहे,तिच्यावर विजय मिळवायलाच हवा."

No comments:

Post a Comment