Saturday, October 2, 2010

(9) भूताबाधेपासून सुटका

सुनंदाबाई कडे सरपंच येवून ,तिच्या नवऱ्या सदानंदाची तक्रार करतात आणि तिला गाव सोडायला सांगतात.सुनंदाबाईच्या नवऱ्याला पिशाच-बाधा होती, तो त्या मुळे गावातल्या लोकांना त्रास द्यायचा.
सुनंदाबाई त्यांच्याशी मुदत मागतात आणि नवऱ्याला स्वामी कडे नेणार असं सांगतात.
सरपंच हे मान्य करतात.
तिकडे स्वामी म्हणतात: "चोळ्या, आरतीची व्यवस्था चोख आहे ना? आज गम्मतच गम्मत येणार आहे."
सदानंदाला, आरतीत आणण्यात येतं,तो धडपडून सुटायचा प्रयत्न करतो.
सुनंदाबाई, नवऱ्यासाठी स्वामी कडे कृपा मागतात.
सदानंद सोडा-सोडा करत राहतो.
स्वामी सुनंदेला, आम्ही मदत करू असं आश्वासन देतात.सदानंद आपल्याला सोडवून पळतो.
दुसर्या दिवशी सदानंद छपरावर चढून बसतो.वरून ओरडत राहतो; "मी नाही जाणार."
कसबसं त्याला उतरवण्यात येवून स्वामी पुढे आणलं जातं.
स्वामी त्याच्या कपाळी विभूती लावतात.
स्वामी-" अब क्यो रोते हो?"
सदानंदाच्या आतलं पिशाच आपली कहाणी सांगतं- "सदानंदानी माझे २००० रु बुडवले,म्हणून मला आत्महत्या करावी लागली
आणि पिशाच बनावं लागलं.
स्वामी न्याय द्या."
स्वामी: "अब क्या चाहते हो? "
पिशाच: " माझे पैशे परत आणि माझा क्रिया-कर्म, सदानंदानी करावं !"
स्वामी सांगतात कि सदानंद स्वत: दरिद्री आहे.
"मी त्याला दरिद्री केलं"- असं पिशाच सांगतं.
"आत्तापर्यंतच्या सदानंदाच्या सेवेनी पैशे फिटले नाही का?"- असं स्वामी विचारतात.
पिशाच, "नाही सोडणार" असं सांगतो.
स्वामी एका कपड्याला उभं २ भागात फाडतात.
सदानंद खाली पडतो आणि बेशुद्ध पडतो.
स्वामी त्याच्या कपाळी स्पर्श करून म्हणतात-"जा त्या झाडावर निघून जा!"
पिशाच जातो.
सदानंद शुद्धीवर येवून स्वामी शरणी येतो. स्वामी सुनंदेला आपल्या पादुका देतात.
सुनंदा, आनंदानी त्या ग्रहण करते.

No comments:

Post a Comment