Saturday, October 2, 2010

(13) गोष्ट दुसऱ्या विवाहाची

माधव आणि लक्ष्मी नावाचं एक जोडपं असतं.
त्यांचा एकदिवस पण स्वामींच्या नामस्मरणा वाचून जात नसतो.
एक दिवस लक्ष्मीचं निधन होतं.
माधवला फार दुखं होतं.स्वामिनी असं का होऊ दिलं, असं म्हणून तो विलाप करतो.
दोन महिन्या नंतर:-
लक्ष्मी गेल्यानंतर माधवचं कामात लक्ष्य राहत नाही ,धंदा बुडायला येतो,५००० रुपयाचं कर्ज होतं.
मित्र माधवला कामात लक्ष्य दे असं सांगतो,पण माधव ला काही सुचत नसल्याने तो त्याला स्वामी कडे जायचा सल्ला देतो.

अक्कलकोट ला जावून ,माधव स्वामी समोर विलाप करतो.
स्वामी:"काय रे !आज आमची आठवण कशी आली?"
माधव आपलं सर्व घाराणं सांगतो.
स्वामी त्याला आल्या पायांनी परत जा असं सांगतात.
स्वामी:"रिक्त हस्तानी पाठवत नाही, आमच्या आशीर्वादा बरोबर पाठवत आहे."
स्वामी: "सुमंगल सावधान!!!"
माधव त्यांच्या पायाशी आयुष्य काढायचं म्हणतो.
स्वामी माधव ला झिडकून ह्कलतात -"जा नाहीतर कम्भर॓त लात घालीन."

माधव आणि मित्र परततात. वाटेत एका घराकडे तहान लागली म्हणून पाण्यासाठी थांबतात.
ते लग्न घर असतं. तिथे एका गृहस्थाच्या दोन मुलींचं लग्न असतं.
पण मोठ्या मुलीचा होणारा नवरा परांगद होतो.
त्यामुळे दुसऱ्या मुलीचं लग्न पण खोळम्बतं.
माधवला, त्यांच्या मोठ्या मुलीचं पाणिग्रहण करा, असं विचारण्यात येतं.

माधव मनात स्वामींना आठवून , "मार्गदर्शन करा" अशी प्रार्थना करतो.
स्वामी मार्गदर्शन करतात -" हेचं तुझं प्राक्तन आहे! कर लग्न.त्या करताच तुला तिथे पाठवलं आहे."
माधवचं लग्न होतं आणि वर-दक्षिणा म्हणून ५००० रु. देण्यात येतात.

विवाहित जोडपं स्वामींच्या दर्शनाला येतात.
स्वामी म्हणतात-" ही माझीच रचना होती.तुला इतकं झिडकारलं तरी तू श्रद्धा अढळ ठेवली.जे सांगितलं ते डोळे झाकून केलं."
"तुला दुखातून बाहेर काढणं भागचं होतं. तू पत्नीशी एकनिष्ठ होता."
"पण माणसं दगा देतात.म्हणून परमेश्वरासी एकनिष्ठ होणं कधीही श्रेष्ठ!"
"दुखं असलं तरी दुखावर पर्याय असतो!"
"तुझा द्विभार्या योग होता. लग्न अटल होतं. दुखातून बाहेर पडं॰
"५००० रुपयांनी आपलं कर्ज फेडं."
"तुला काहीही कमी पडणार नाही."

बोध:सद्गुरू कितीही रागावले तरी तरी कृपा करतातचं.

No comments:

Post a Comment