Friday, October 29, 2010

(33) स्वामींनी दिला पुरावा

वैष्णव नावाचं एक गाव होतं. तिथे गोपाळ बुवा नावाचे
एक नावाजलेले प्रभोधनकार होते.
अख्या पंचक्रोशीत त्यांचं नाव होतं.
एकदा इंग्रज सरकार त्या गावावर जपती आणतात
.गावकऱ्यांना तो गाव इनाम  म्हणुन  मिळाला होता पण
त्यांच्या कडे काही पण पुरावा नव्हता.
गोपाळ बुवांना आपल्या नामांकित पणाचा फार गर्व होतं.
पण इंग्रज सरकार त्यांना लेशमात्र ही किम्मत देत नाही.
शेवटी सर्व स्वामींच्या शरणी जातात.
स्वामी सर्व अधिकाऱ्यांना पाण्याच्या ओढ्या जवळ बोलावतात.
स्वामी म्हणतात:-" पाणी के अंदर सबुत है ,धुंडो उसे?"
शिपाई शोध घेतात,तेव्हा त्यांना पाण्यात एक दगड सापडतो,त्याच्यावर
स्पष्ट लिहिलेलं असतं, कि हा गाव
सयाजीराव राजानी इनाम म्हणुन वामनराव जोशी यांना दिला होता.
गावावरची जप्ती टळते.
गोपाळ बुवांचा गर्व ही नाहीसा होतो.
सर्व गावकरी स्वामी चरणी नतमस्तक होतात.

No comments:

Post a Comment