Sunday, December 18, 2011

(११०) क्यो रंडी छोडी कि नही?




सोहनी नावाचा एक माणूस विधुर होता. दोन विवाह करून पण त्याचं कुटुंब नव्हते.
आपल्या आईच्या सल्ल्यानी तो तिसरे लग्न करायचे ठरवतो व त्या साठी स्वामींची परवानगी मागतो.
स्वामी चक्क नकार देतात तरीही आईच्या सांगण्यानी सोहनी लग्न करतो.
इकडे चोळप्पा आणी त्याची पत्नी स्वामी मुळे झालेल्या सोई आणी आमदनी मुळे खुश असतात.
त्यात अक्कलकोट संस्थाना कडून स्वामिनी मिळवून दिलेल्या मेहनतान्यानी त्यांना फार आधार असतो.
पण स्वामी जर सोडून गेले तर हे सर्व सुखं नाहीसे होईल अशी शंका चोळप्पाची बायको काढते.
चोळप्पा एक खड्डा खणतो. त्याचा उद्देश तो खड्डा स्वामींच्या समाधी साठी खणण्याचा असतो.
स्वामींना जेव्हा हे कळते तेव्हा ते म्हणतात: " अरे चोळ्या, आमच्या आधी आम्ही तुला या खड्यात घालून जाऊ."
स्वामी वचनाचे गांभीर्य कळून चोळप्पाची बायको कासावीस होते.
पण चोळप्पा गुरूच्या आधी जर शिष्याचे मरण आले तर याला भाग्य समजतो.
सोहनी आपल्या नूतन पत्नी सह स्वामींचा आशीर्वाद घ्यायला येतो.
स्वामी रागावतात :"अरे नाही म्हटले तरी तू लग्न केले ना . आता कशाला इथे आला आहे?".
सोहनी आपल्या नूतन पत्नी सह स्वामींचे पाय पडतो.
स्वामी म्हणतात: "तुझ्या ललाटी जे लिहिले आहे ते तुला प्राप्त हो. "
काही दिवसांनी सोहनीची बायको जीना उतरताना खाली पडते, तिच्या कम्भरेला मार बसून ती कायमची अंथरुणाला खिळते.
सोहनी स्वामी शरणी येतो.
स्वामी म्हणतात; " अरे तुला म्हटले होते, लग्न नको करू, त्तरी आमची आज्ञा मोडून तू लग्न केले."
"तुझ्या भाग्यात लग्न होते पण लग्नाचे सुखं नव्हते."
"आता जा इथून, आमच्या कडे काही उपाय नाही."

सोहनी निराशहून परततो.
त्याच्या घरी आळंदीचे नृसिंह सरस्वती आलेले असतात.
सोहनी व त्यांची मातोश्री त्यांना सर्व घाराणे सांगून उपाय मागतात.
नृसिंह स्वामी म्हणतात: "स्वामींनी म्हटले म्हणजे विधिलिखित, ते टळणे शक्य नाही."
"माझ्या जवळ सिद्ध्य आहे पण सिद्धीनी सुखं मिळते विधिलिखित टळत नाही."
सोहनी च्या सल्ल्यावर नृसिंह महाराज स्वामींना भेटायला जातात.
नृसिंह महाराज यायच्या आधी स्वामी शिष्या कडून व्याघ्रांबर मांडून ठेवतात.
नृसिंह महाराजांना पाहताच स्वामी म्हणतात:" क्यो रंडी छोडी की नही?"
नृसिंह स्वामी म्हणतात: " अभी तक तो नाही छोडी पार आपकी कृपा हुई तो जल्दी ही छोड दुंगा."

सर्व शिष्यांना नृसिंह स्वामींचा किळस येतो, एवढे मोठे महात्मा असून अशे चाळे.
स्वामी ओरडून म्हणतत: " अरे मुर्खानो रंडी म्हणजे कोणी स्त्री नसून आमचा अर्थ सिद्धीशी आहे.
जो पर्यंत हा नृसिंह सिद्धीच्या तावडीतून सुटणारा नाही तो पर्यंत त्याचा मोक्ष मार्ग उघडणार नाही.
मग स्वामी नृसिंह महाराजांना त्या व्याघ्रांबरा वर ध्यान लावायला सांगतात.
स्वामी कृपेनी त्यांना मोक्ष मार्ग सापडतो. आपण कुठे कमी पडत होतो ते कळते.
मग स्वामी त्यांना आशीर्वाद देतात, कि तुला तर मोक्ष मिळेलच पण तुझे दर्शन करणाऱ्यांना पण मोक्ष मिळणार.

(१०९) अहमदअली ला धडा




अहमदअली एक कट्टर मुस्लीम व्यक्ती होता. इतर मुस्लीम व्यक्तीनी स्वामींकडे गेलेले त्याला अगदी खपत नव्हते.
एक दिवस तो वैतागून स्वामींची हाजिरी घ्यायला जातो.
तो दिवस तो वटवृक्षा कडे  जाऊन उद्धटपणे विचारतो-" यहा स्वामी समर्थ कौन है?"

स्वामी म्हणतात: " आम्ही आहे स्वामी समर्थ!"
अहमद अली स्वामींना पाहतो तर पाहतच राहतो. जणू त्याचा पुतळाच होतो. तो अगदी स्थिर तसाच उभा राहतो.
काही काळानी स्वामी-इच्छेनी तो भानात येतो.
स्वामी त्याला चंद्र पाहायला सांगतात. त्याला चंद्रात स्वामींचा चेहरा दिसतो.
त्याला स्वामींच्या अधिकाराची जाणीव होतो. ज्या चंद्राला मुस्लीम एवढं पवित्र मानतात त्यात स्वामी दिसल्यानी
त्याला कळतं कि स्वामीच त्याचा अल्ला आहे.
तो स्वामींच्या शरणी येतो.

Friday, December 2, 2011

(१०८) हमारी कस्तुरी लाओ






ठाकुरदास नावाचा एक प्रसिद्ध प्रभोधनकार होता. तो जेव्हा कीर्तन करायचा तेव्हा लोकं साक्षात डोलायचे.
तो अनन्य दत्तभक्त होता. इतके असूनही तो दुखी होता-कारण त्याच्या अंगावर उभरलेले कोढ.
त्याला फक्त हाच प्रश्न होता कि जन्म भर एवढी अनन्य भावानी दत्त उपासना करून आपल्याला कोढ का झाला!
एक दिवस तो वैतागून निर्णय करतो कि आता संसार सोडून काशीला जाऊन वाचलेले जीवन तिथेच काढावे.
तो आपल्या परिवाराची व्यवस्था लाऊन काशी ला जायची तैयारी करतो.
त्याआधी तो गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करायचा विचार करतो.
जायच्या आधी तो गावकऱ्यांच्या आग्रहाखातर गावात दत्तप्रभोधन करतो.
त्या रात्री साक्षात दत्तगुरु स्वप्नात येऊन आज्ञा करतात कि काशी ला न जाता अक्कलकोटला जा.
दत्त आज्ञा झाल्यानी तो काशी ला न जाता अक्कलकोटला जातो.
स्वामी त्याला पाहताच म्हणतात: "हमारी कस्तुरी लाओ !"
ठाकुरदासला स्वामींचा अधिकार कळतो. स्वामी साक्षात दत्त अवतार आहे, अशी त्याला प्रचीती होते.
तो स्वामी चरणी मस्तक ठेवतो.
ठाकुरदास स्वामींना म्हणतो: " जन्म भर दत्त-उपासना करून पण मला कुष्ठ रोग का झाला ?"
स्वमी म्हणतात: "हे तुझे भोग आहे. वेळ आले कि ते संपतील."
काही दिवसांनी स्वामी ठाकूरदासला चुलीतले विझलेले लाकूड आणायला सांगतात व त्याचे काळोख तोंडावर फासायला सांगतात.
ठाकूरदासचा कुष्ठ बरा होतो.
स्वामी बोध करतात: " कर्म मुळे विपरीत-प्रारब्ध प्राप्त झाल्यानी सद्कर्माची कास सोडू नये. उपासना पंथ सांडू नये."
"भोग आपली वेळ आली कि आपोआप संपणार".
ठाकुरदास स्वामी चरणी मस्तक ठेवतो.

(१०७) राज हट्टाचा पराभव




बडोद्याचे राजा मल्हारराव गायकवाड यांच्या मनात स्वामींना बडोद्याला आणायचा विचार येतो..
लोकानी  स्वामींना बडोद्याचे स्वामी समर्थ अशे जाणावे, असे  त्यांना वाटले.
ते दरबारात विडा ठेवतात कि जो कोणी स्वामींना बडोद्याला आणेल त्यांना धन आणी जागीर देऊ.
तात्या साहेब नावाचे सरदार तो विडा उचलतात.ते अक्कलकोट साठी निघतात.
सुंदराबाई नावाची एक स्त्री होती, ती पायाला झालेल्या घावांनी बेजार झाली होती. काहीही केल्या घाव बरा होत नव्हता.
कोणी तरी तिला अक्कलकोटला स्वामींच्या शरणी जा, अस सुचवतात.
तात्या साहेबांना आपण स्वामी भक्त आहे अशी सूचना देऊन सुंदराबाई चक्क त्यांच्या रिकाम्या असलेल्या घोड्यावर बसून अक्कलकोटला येतात.
स्वामींच्या फक्त कृपादृष्टीनी सुन्दाराबाईचा पाय बरा होतो.
स्वामींकडे येणाऱ्या लोकांची गर्दी आणी अक्कलकोटचे ऐश्वर्य पाहून सुंदाराबाई अक्काल्कोटलाच राहण्याचा विचार करत्तात.
तात्यासाहेब स्वामींना बडोद्याला या अस निमंत्रण करतात, स्वामी साफ ते निमंत्रण फेटाळून लावतात.
तात्यासाहेब खूप प्रयत्न करतात. दान-धर्म.,अन्नदान पण स्वामी काही अक्कलकोट सोडायला तैयार होत नाही.
शेवटी ते चोळप्पा ला १०,००० रु. ची जागीरीचे लालूच देतात.
चोळप्पा स्वामींना बडोद्याला चला असा सल्ला देतात.
स्वामी म्हणतात: " अरे चोळ्या ! साक्षात तुझ्या समोर त्रिभुवनाचे वैभव लोळत आहे तरी तू १०,००० रु. च्या जागिरी बद्दल विचार करत आहे."
चोळप्पा खजील होतात.
शेवटी हार मानून तात्या साहेब परततात.
यशवंत राव या वेळेला विडा उचलतात.
ते स्वामींना थोड्या धाकाच्या भाषेत बोलतात, स्वामी एकदम ओरडतात- " अरे याला बेड्या घाला.".
कुणालाही काही कळत नाही. पण  थोड्याच वेळात बडोद्याचे सैनिक येऊन यशवंतरावला बेडया घालून अटक करतात.
नंतर उलघडा होतो कि यशवंतरावानी राजाला दासीच्या हाती विष दिले होते. पण राजाचे प्राण वाचतात.


राजाला पण आपली चूक कळते कि राजहट्टाचा अंमल मायेत गुंतलेले साधारण माणसावर चालवता येतो पण मायेचा समुद्र ओलांडून गेलेले 
थोर संतांवर आपण सत्ता गाजवू शकत नाही.
राजा आपला हट्ट सोडतो.





Sunday, November 20, 2011

(106) बाळप्पाची स्वामीभेट


कोंडुनाना स्वामींशी तीर्थयात्रे साठी परवानगी मागतात. स्वामी होकार देतात आणि म्हणतात: "जा पण आमच्या श्वानाला पण घेऊन ये."
कोंडु नानाला पाहून चोळप्पा पण तुळजापूरला भवानी मातेचे दर्शन करण्या साठी आज्ञा मागतो.
स्वामी चोळप्पाला तुळजापूरच्या भवानी मातेचे रूप दाखवतात.
चोळप्पा गहिवरून म्हणतो:-"स्वामी ३३ कोटी देव माझ्या समोर असतांना मी उगीच तीर्थ यात्रेची कामना केली हो !"
कोंडुनाना गाणगापूरला येतात. तहानेनी व्याकुळ होऊन ते विहिरीतून पाणी काढून प्यायला जातात.
जसच पाणी काढले जाते, त्यांच्या कम्भरेत एक लात पडते.
मागे पाहतात तर काय घोड्यावर बसलेला एका इंग्रजांनी ती लात मारली होती.
ती विहीर ब्रिटीश अधिकाऱ्यांना पाणी-पुरवठा करण्यासाठी होती, आणि सत्तेत आंधळे झालेल्या इंग्रजांनला 
एका गरीब भारतीयांनी त्यातून पाणी घेतलेले सहन झाले नाही.
बाळप्पा कोंडुनानाला हात देऊन उचलतात आणि धर्मशाळेत नेतात.
बालप्पा श्रीमंत घराचे असतात,त्यांचा मोठ्ठा कारोबार असतो आणि ते घर आणि व्यवसाय सोडून 
गुरूच्या शोधात बाहेर निघालेले असतात.
कोंडुनानांना बाळप्पाला भेटुन  कळते कि स्वामिनी ज्या श्वानाला आण म्हटले ते हेच.
ते बाळप्पाना म्हणतात कि तुमचा गुरूचा शोध संपला, अक्कलकोट चे स्वामींनी तुम्हाला बोलावले आहे.
बाळप्पा अक्कलकोटला यायला तैयार होतात.
पण रात्री स्वप्नात दृष्टांत देऊन स्वामी बाळप्पाला म्हणतात:-" उतावळा होऊ नको. भेटेची वेळ अजून आली नाही."
तिकडे त्या इंग्रजाला अकस्मात पायात इजा होते-ज्या पायांनी लात मारली त्याच पायात.
रस्त्यात भेट झाल्यावर इंग्रज आपले दुख कोंडु नानाला सांगतो.कोन्दुंना त्याल स्वामींच्या शरणी ये असे सांगतात.
इंग्रज अधिकारी कोंडु नाना बरोबर अक्कलकोटला येतो. बाळप्पा गाणगापुरलाच  राहूनच आराधना करतात.
इंग्रज अक्कलकोटला स्वामींच्या चरणात पडून म्हणतो कि स्वामी मला स्पर्श करून बरं करा.
स्वामी म्हणतात: "अरे पहिले आम्हाला लाता मारतो आणि आता चरणानी स्पर्श करा असे म्हणतो!"
इंग्रज म्हणतो: " मी केंव्हातुम्हाला लात मारली?"
स्वमी म्हणतात: ' आम्ही आमच्या भक्तांच्या ठाई वास करतो. आणि तू आमच्या भक्ताला लात मारली."
इंग्रज  आपली चूक मान्य करतो.
मग स्वामी उपाय सांगतात: " तांदूळ धुतलेले पाणी आणि वाटलेले आळू चे कांदे एकत्र करून लाव तुझा पाय बरा होईल."
तिकडे धर्मशाळेत बाळप्पा पाण्याच्या नांदीत बुडत असलेल्या विन्चुला पाहतात.
त्या विन्चुचे प्राण वाचवायला बाळप्पा त्याला हातानी बाहेर काढतात.या प्रयत्नात विंचू त्यांना चावतो पण बाळप्पा त्याला बाहेर काढतात.
स्वामी बाळप्पाला  दृष्टांत देऊन सांगत्तात: "बाळप्पा तू परीक्षेत उतीर्ण झाला".
बाळप्पा ठरवतात कि जर एका हि घरात भिक्षेत जर गव्हाच्या पोळ्या मिळाल्या तर यालाच 
स्वामींची आज्ञा मानून अक्कलकोटला प्रस्थान करायचं.
शेवटी एका घरात गव्हाच्या पोळ्या मिळतात आणि बालप्पा अक्कलकोटला येतात.
बाळप्पा नी आणलेली खाडी साखर स्वामी सर्वाना देतात पण बाळप्पाला देत नाही.
स्वामी म्हणता: " बाळप्पा इथे राहणे सोपे नाही. तुला स्वताला सिद्ध करावे लागेल."
त्यानंतर बाळप्पा गुरु सेवेला लागतात आणि लहान-मोठे सर्व कार्य करायला लागतात.
बाळप्पा श्रीमंत घरातले असल्यानी, स्वामी नी हे हि योजना केलेली होती.

(१०५) कथा एका किमायागाराची




स्वामी चोळप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळतात.स्वामी म्हणतात-"जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिझे ! लक्ष केंद्रित करावं लागतं."
खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच.चोळप्पाची सासू पारायण करत असते, तिला त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात,
निदान थोड्या वेळपर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते.
स्वामी मान्य करतात.पण समझ पण देतात-"पारायण करताना खेळाचा आवाज ऐकु तरी कसा येतो ? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताताना तर ती उच्च पातळीची हवी."
चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो.वामन बुवा स्वामींना पहातच राहतात.
एका मुलाला भूख लागली म्हणून स्वामी आतून नेवेद्याचे अन्न आणून घास भरवतात.
नेवेद्याचे अन्न आणताना ,चोल्प्पाची सासू विरोध करते.पण स्वामी दुमानत नाही. स्वामी सांगतात:"पोथी नुसती वाचू नका आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं-ओवळं यांच्या जास्त नादी लागू नका.चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाशी तक्रार करतात पण चोळप्पा काही ऐकत नाही.
तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना स्वामी बद्दल घालुन-पाडुन बोलतात.मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामी कडे जातात.
घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही. उलट ते घोलपस्वामींना,आपल्या गुरु स्वामीसमर्था बद्दल सांगतात.
घोलपस्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वाद विवाद होतो. जाता-जाता वामन बुवा सांगून जातात कि माझे गुरु येईल तुमची परीक्षा पहायला.
इकडे स्वामी चोळप्पाला गांवो-गाव फिरून आपला उपदेश जन-सामान्यात आपला उपदेश पोचंव, असं सांगतात-"तू सर्वाना समर्पण शिकवू शकतो. वामनाला पण तू दीक्षा दिली.खूप सोसले आहे त्यांनी माझ्या साठी.मी त्याच्या पाठीशी आहे. "
तिकडे शास्त्रीबुवा घोलपस्वामी कडे दगडं घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात.अर्ध सोनं आम्ही घेऊ अश्या अटीवर घोलपस्वामी,आपले प्रयत्न सुरु करतात. पण काय,काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही,त्यांना वाटतं कि वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे,म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात.
घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवांवर टाकायला जातात. पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणी उलट तेच स्वता पडून त्याचं धोंड्या खाली चिरडले जातात.
धोंड्याच्या आवाजांनी वामन बुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते,ते मनो-मन स्वामींना आपले रक्षण केल्या बद्दल धन्यवाद देतात.
काही वेळानी घोलप जागे होतात, त्यांना स्वामींच्या सामर्थाची प्रचीती येते.
ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात.
स्वामी बोध करतात: "घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये.अरे आपले सामर्थ आणी शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणा करता करावा."
"त्यांना धर्म-प्रवृत्त करण्यात करावा."
"ब्रह्मचा अंतिम सत्य आहे बाकी सर्व क्षण भंगुर आहे' ह्या गोष्टीची जाणीव सर्वाना करुन द्यायला हवी."
स्वामी घोलपना माहूर ला जान राहायची आज्ञा करतात.
पहिले घोलप यांना स्वामी-चरण सोडुन जाणे जीवावर येतं पण मग ते बारकाई नी  विचार करतात कि माहूरला आदिमायेच्या रुपात स्वामीच आहे,
 असे समझुन ते माहूर साठी प्रस्थान करतात.
स्वामी मग वामन बुवाचे कौतुक करतात.
स्वामी म्हणतात: "अरे इतके प्रलोभन वाहत असताना सुद्धा तु तटस्थ राहिला, गुरुवर निष्ट आढळ ठेवली."
"तु परीक्षेत उतीर्ण झाला आहे."
"तुझी मोक्षाची वाटचाल आता सुरु झाली आहे."

Monday, November 7, 2011

(१०४) मी पणाचा पराभव

बाबा सबनीस एक प्रकांड विद्वान कीर्तनकार होते. राम मंदिरात त्यांचे कीर्तन होते. सर्व लोकं मंत्र-मुग्ध होऊन कीर्तन ऐकतात.
तिथे हरीबाई नावाची एक बाई येते आणी मंदिराच्या पायरीवर किर्तना कडे पाठ करुन रामाचे नामस्मरण करत बसते.
कीर्तन संपल्यावर हरी बाईला बाबा सबनीस विचारतात-" तुम्हाला काय आम्ह्चे कीर्तन ऐकावे असे नाही वाटत का?"
हरी बाई थोड्या फटकल पणे बोलते-"या मोठ्या-मोठ्या गोष्टी मला समझत नाही.कानातून मनात पोहचत नाही. "
"आम्हाला आमचे स्वामींच्या साध्या-सरळ गोष्टी आवडतात."
तितक्यात नारायण शास्त्री येउन बाबा सबनीसला म्हणतात:" तुम्ही या मुर्ख बाईशी काय वाद घालत आहा?'
" या सर्वाना त्या भोंदू स्वामीनी वेड लावले आहे."
मग शास्त्री बाबा सबनीसला म्हणातात की हनुमान जयंतीला स्वामी राम मंदिरात येणार आहे, तिथे तुम्ही आपल्या विद्वत्तेनी शास्त्रात
त्यांचा पराभव करा.
हनुमान जयंतीच्या दिवशी स्वामी मंदिरात येतात.बाबा सबनीस त्यांना तत्व-ज्ञानाचे प्रश्न विचारतात.
स्वामी म्हणातात: "अरे ह्या गोष्टी आम्हाला काय माहित! आम्ही काय पुराण वाचतो का?"
मग स्वामी वामकुक्षी साठी निघून जाता.
नारायण शास्त्री आणी बाबा सबनीस तिथेच स्वामींची टवाळी करत राहतात.
तितक्यात एक साप येउन बाबा सबनीसला डसतो.
योगा-योगानी गावात राहणारे मांत्रिक आणी वैद्य सुद्धा गावात नसतात.
गावकरी म्हणातात की आता फक्त स्वामीच वाचवू शकतात.
माणूस कितीही ज्ञानी असला तरी संकटात फक्त देहबुद्धी पर्यंतच त्याचे ज्ञान मर्यादित राहते.
बाबा सबनीस आपला ताठा सोडुन स्वामी शरणी यायला निघतात्त.
स्वामी पहिले बाबा सबनीस ची फिरकी घेतात:- "अरे आम्ही काय करणार? आम्ही वेद-पुराण थोडेच वाचले आहे!
आम्हाला काय कळतं तत्व ज्ञाना बद्दल ?"
आता तर विषा मुळे बाबा सबनीसना  प्रचंड वेदना व्हायला लागल्या होत्या.
बाबा सबनीस एकदम शरणागती पत्करतात आणी केविलवाण्या स्वरात म्हणातात:- "स्वामी काही पण करा हो .... पण मला वाचवा . "
"विष आता तर झोंबून राहिले आहे."
स्वामींना दया येते. जशी दिव्यात काजळी असते तसच मान-लोकिक मिळवलेल्या विद्वानाच्या ठायी अभिमान तर असणारच.
स्वामी एक ताठ मागवून सबनीस यांना सर्पदंश झालेला पाय ताठात ठेवायला सांगतात.
स्वामींच्या कृपा-दृष्टीनी आपो-आप विष बाहेर ताठात पडायला लागतं.
सर्व विष गेल्यावर बाबा सबनीस च्या प्राणात-प्राण येतो.
ते स्वामींच्या चरणी पडतात.
स्वामी बोध करतात: "ज्ञान श्रेष्ठ असतं पण थोडे ज्ञान झाल्याने भक्ती असलेल्या लोकांना नडू नये."
"ज्यांनी-त्यांनी आपल्या पद्धतीनी ईश्वराची उपासना करावी."
"ज्ञान-कर्म-आणी भक्ती तिन्ही जीवाला ईश्वरा कडे नेतात."
"ज्याला जी वाट सोयीस्कर वाटेल त्यांनी ती वाट पत्करावी."
सबनीस आपली चुक मान्य करतात.

(१०३) दुष्काळा पासुन सुटका

एकदा अक्कलकोट मध्ये दुष्काळ पडतो. खायला अन्न नाही आणी प्यायला पाणी नाही.
लोकं आसुसून पावसाची वाट पाहतात पण पाऊस काही
पडत नाही. सर्व स्वामींकडे येतात. स्वामी त्यांना रेणुका-सहस्त्रनाम आणी पर्जन्य-सुक्त वाचायला सांगतात.
काही जन उपासनेला बसतात पण पाऊस काही पडत नाही.
स्वामी आपल्या एका भक्ताला घेऊन अक्कलकोटच्या बाहेर पडतात.
तिथे एका शिव मंदिरात जातात.
तिथल्या शिवाच्या पिंडीला रोखटोक पणे विचारतात :"काय समस्या आहे तुमची? पाऊस का नाही पाडत?"
मग तिथुन निघतांना स्वामी म्हणातात:" आम्ही वळसण गावाला पोहचू तो पर्यंत पाऊस पडला पाहिजे."
स्वामी त्या मंदिरातून परततात, चालता-चालता वळसण  गाव लागतो तरी पावसाचा काही थांग-पत्ता नसतो.
स्वामी तिथल्या शिव मंदिरात जातात.
स्वामी तिथल्या शिव-पिंडीला जाब विचारतात:-" काय समस्या आहे तुमची ? पाऊस का नाही पाडत ?"
" अच्छा हरभरे पाहिजे तुम्हाला ?"
मग स्वामी भक्ताला आज्ञा करतात:- "जा हरभरे घेऊन ये."
भक्त गेल्यावर स्वामी स्वता शिव आराधना करायला बसतात.
स्वामी जोर-जोऱ्यात उपासना करतात:-" शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो .."
'हे  गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो "
" शंभो s s ......"
इकडे स्वामी शिव आराधना करतात तिथे गावकरी स्वामींनी सांगीतलेली आराधना करतात.
मग काय  नर-नारायण एक होता, पाऊस काय पडल्या शिवाय राहणार?
एकदम आकाश  ढगांनी अंधारून जाते आणी जोरदार पाऊस पडायला लागतो.
स्वामी जेव्हा अक्कलकोटला परततात तेव्हा सर्व गावकरी
स्वामींच्या चरणी लीन होतात.
स्वामी बोध करतात: " अरे निसर्ग कोपतो याचे करण असतं. तुम्ही लोकांचे कर्म जवाबदार असतात. "
"तुम्ही आपल्या स्वार्थ आणी सोयी साठी निसर्गाची विटंबना करतात."
" हिरव्या झाडांना कापतात. अरे उन्हाळ्यात ज्या झाडा खाली विसावा घेतात, थंडीत त्याचं झाडाला कापून
त्याची शेकोटी करतात."
"मनुष्याचे पापं वाढले की निसर्ग कोपतो आणी निसर्ग कोपल्यावर देवाला दुषण लाऊन काहीही साध्य नाही होणार."
"मनुष्यांनी न्यायनी वागावे, निसर्गाचा मान राखावा, आपल्या स्वार्थावर आटोका ठेवावा."
"ईश्वर कधीही अन्यायी नसतो पण होणारा त्रास प्रतिकुल कर्मामुळेच उद्भवतो."
"म्हणुन मनुष्यांनी सतत ईश्वराची उपासना करावी.कळत-नकळत झालेले दोष ईश्वर भक्तिनी घालवावे."
सर्व गावकरी आपली चुक मान्य करतात.

(१०२) पाप पुण्याचा जमाखर्च

गोविंद नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. तो फार दान-पुण्य करायचा. पण तो एका भयंकर व्याधींनी ग्रस्त होता-
भोजन झाल्यावर त्याच्या पोटात भयंकर वेदना व्हायच्या.
त्याचा मित्र त्याला स्वामींकडे आणतो.
स्वामी उपाय संगतात्त- "सात दिवस फक्त गाईचे शेण खायचे आणी गोमुत्र प्यायचे, या अतिरिक्त काहीही खायचे नाही."
उपाय म्हणजे अगदी द्रविडी प्राणायामच होता पण प्रचंड  वेदनेंना आठवून गोविंद तैयार होतो, सात दिवसा नंतर
तो पूर्ण पणे बरा होऊन स्वामींच्या चरणी पडतो.
तो स्वामींना विचारतो-" मी इतके दान पुण्य करतो तरी माझ्या वाटेला हे दुख का आले?"
स्वामी म्हणतात:" अरे भाग्यानी तु श्रीमंत झाला आणी थोडे-फार दान पुण्य करण्याची काय गमजा मारतो?"
"अरे जे थोडे फार असते त्यातले पण कुणाला देणे ह्याला खरी किम्मत आहे."
"श्रीमंतानी सुपात्र गरजवंतांना दान केलेच पाहिजे."
"आणी तुझ्या भोगला तुझीच कर्म जवाबदार आहे."
गरीब असताना तुझ्या कडे एक गाय होती, ती वृद्ध होऊन तिनी जेव्हा दुध देणे बंद केले तेव्हा तु तिचा चारा बंद केला."
"ती गोमाता भूखेच्या वेदना सहन करत मेली, तुझ्या हातून घडलेल्या या पापा मुळे तुला हे भोग प्राप्त झाले आहे."
"अरे आपली कशीही परिस्थिती असली तरी मनुष्याला आपले कर्तव्य सोडता येत नाही."
गोविंद आपली चुक मान्य करतो आणी स्वामींनी रोगमुक्त केल्या मुळे स्वामींच्या चरणी मस्तक ठेवतो.

(१०१) मनुष्य आणी स्वार्थ

नारायण नावाचा एक राजस्थानी माणूस होता. त्याची बायकोची प्रसुतीची वेळ आली होती पण मुल अडले होते.
काहीही करुन बायकोची प्रसुती होत नव्हती.
तितक्यात एक साधू येउन त्याला सल्ला देतो की अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना साकडं घाल आणी मुल झाले की
अक्कलकोटला ब्राह्मण वाढ.
हेकेखोर नारायण पहिले वाद घालतो पण अडलेला माणूस कितीवेळ हट्टावर पेटून राहणार.
तो शेवटी स्वामींना बायको आणी संततीसह  अक्कलकोटला येईन असा नवस सांगतो.
नवस करताच लगेच त्याची बायको सुखरूप प्रसूत होते.
पाहता-पाहता मुलगा मोठा होतो तरी नारायण नवस फेडत नाही. त्याची आईनी आठवण करुन दिली तर तो
तीचाशीच हुज्जत घालायचा.
एकदिवस आईनी अन्न-पाणी त्याग करणार अशी धमकी दिल्यानी तो अक्कलकोटला यायला तैयार होतो.
अक्कलकोटला जसाच तो स्वामींचे पाया पडतो, स्वामी त्याला पाडून देतात.
स्वामी रागावतात:" अरे कृतघ्ना ! आता आठवण आली नवस फेडायची.चल चालता हो."
नारायण परिवारासह परत फिरतो.
मुक्कामाच्या जागेवर येताच त्याला कडकडून ताप येतो आणी तो अंथरुणाला खिळतो.कितीही उपचार झाले तरी तो
बरा होत नाही. अनेक दिवस झाल्यावर त्याला पश्चाताप होतो आणी तो स्वामींची करुणा भाकतो.
आपली चुक झाली अशी प्रांजळपणे कबुली देतो.
लगेचच स्वामी तिथे प्रगट होतात आणी त्याला बोध देतात:
" अरे तुझ्या अहंकार आणी कृतघ्नपणा मुळे तुला हे भोग प्राप्त झाले होते,तुझ्या या आजारपणामुळे ते भोग संपले,
आणी आपली चुक प्रामाणिक पणे कबुल केल्यानी तुझ प्रायश्चित ही झाले."
असं म्हणुन स्वामी अदृश्य होतात.
नारायण लगेच बरा होतो आणी मनोमन स्वामींना नमस्कार करतो.

Monday, October 24, 2011

(१००) गुरु त्रिकालज्ञानी

वामन नावाचा एक माणूस पुराण सांगून आपले व परिवाराचे चरितार्थ चालवत होता. पण गावात दुष्काळ पसरतो आणी कोणी
पुराण ऐकण्यासाठी दक्षिणा द्यायला तैयार नसतो.
संसाराला कंटाळुन वामन बायको आणी आई सह स्वामी शरणी वाचलेले आयुष्य काढायचे ठरवतात.
पण स्वामी वामनला झिडकारतात " अरे प्रपंचात हरून परमार्था कडे वळण्यात काय अर्थ आहे ? अरे अनुकूल प्रपंच असताना
जो ईश्वरा कडे वळतो त्याची खरी किम्मत असते."
"इथे राहुन आम्हाला काय पुराण ऐकवणार ? अरे आम्ही संसाराची उत्पत्ती केली आणी आम्हालाच तु पुराण सांगणार?"
अशे अनेक दिवस स्वामी वामन ला अशेच हिणवतात.
एक रात्री वामन  वैतागून वनात पळून जातो. तिथे मनातला उद्वेग जावा म्हणुन तो ईश्वराचे ध्यान करत बसतो.
सकाळी वामनची आई आणी बायको पाहतात तर वामन नसतो, ते कावरे-बावरे होऊन स्वामींकडे जातात.
वामनाची आई स्वामींना  म्हणते:" तुम्ही वामनला आपल्या पदरात घेतले नाही म्हणुन तो वैतागून पळून गेला."
स्वामी म्हणतात: " अरे पळपुटा आहे वामन . प्रपंच जमला नाही म्हणुन परमार्थाकडे वळला."
मग स्वामी जोर-जोऱ्यात वामन ला हाक मारतात.
वनात ध्यानस्थ बसलेल्या वामनच्या कानात आवाज गुंजतो.
स्वामींची आज्ञा समझुन तो स्वामी कडे परत येतो.
स्वामी म्हणतात: "अरे मागच्या जन्मात तुझ्या हातून खूप जीव-ह्त्या झाली होती. "
"आमच्या नकारानी तुला जो मानसिक त्रास झाला त्यांनी तुझ्या पापांची भरपाई झाली."
"आम्ही आधीच जर तुला होकार दिला असता तर ते पापं नष्ट झाले नसते."
"तुझ्या साठी आमचा नकार जास्त फायदेमंद होता."
वामन स्वामींना अनन्य भावांनी शरण जातो.
 

(९९) गुरु तारणहार

राज्यात पाण्याची टंचाई होते, म्हणुन राजे विहीरी आणी पाणपोई बनवा अशी आज्ञा देतात.
नथोबाला ही जवाबदारी देण्यात येते. नथोबा अनन्य स्वामीभक्त होता.
राज्याच्या दरबारात दाजीबा नावाचा एक  अगदी अप्रामाणिक व्यक्ती होता.
तो नथोबाला खर्च जास्त दाखवून उरलेली रकम आपसात वाटू, असा सल्ला देतो.
प्रामाणिक नथोबा ठाम पणे नकार देतो.
रघुनाथ शास्त्री दाजीबाला कुटील सल्ला देतो. त्याप्रमाणे दाजीबा राजाला चाहाडी करतो की नाथोबा सरकारी खजिन्यात
गफलत करत आहे.
राजा हिशोब मागवतात तर खरच फार मोठी रकम कमी निघते.
राजा नथोबाला बडतर्फ करतात आणी १०० फटक्याची शिक्षा पण ठोठावतात.
रात्री राजा स्वामींच्या दर्शनाला येतात, नमस्कार करतांना स्वामी राजाला हातानी ढकलून पाडून देतात.
स्वामी रागावतात: "अरे राजा असून डोळ्यावर झापड  लाऊन काय बसला आहे. राजानी डोळस असले पाहिजे."
"अरे पूर्ण शाहनिशा न करता तु प्रामाणिक आणी निष्पाप लोकांना काय शिक्षा करतो."
"अरे हे सर्व दाजीबानी रचलेला कट आहे.तितक्यात खजिन्याचे अधिकारी येउन सांगतात की हिशोब अगदी चोख आहे आणी
काही गल्लत झाल्यामुळे हिशोब चुकला होता."
राजा नथोबाची शिक्षा माफ करुन पुन्हा कामावर पण रुजू करतो.
पण नथोबाचा तर मोह्भंग झाला होता, तो संसाराला राम-राम करून स्वामी-सेवेत आयुष्य काढायचे ठरवतो.

(९८) प्रपंच आणी परमार्थ

रामू आणी अनुसुया, हे एक जोडपं होते. वयाची साठी ओलांडली तरी वागणे एका नूतन लग्न झालेल्या जोडप्या सारखे-
सदैव बरोबर हिंडणे, बरोबर जेवणे, त्यांना जणुएकमेकाशिवाय करमत नव्हते.
एकदा स्वामी रामू ला म्हणतात -" अरे साठी ओलांडली तरी फक्त प्रपंचात काय गुरफटला आहे.
काही देवाचे कर तीर्थाटन कर."
मग काय रामू बुवा निघाले तीर्थाटन करायला पण जोडीनी.
काही दुर गेल्यावर अनुसूया बाई दमतात आणी रामू बुवा तिच्या साठी पाणी आणायला जातात.
पाणी घेऊन येतात तर पहातात त रकाय अनुसूया बाई जागेवर नाही. कितीही शोधले तरी सापडत नाही.
रामू बुवा स्वामी कडे परतून आपले घाराणे सांगतात.
स्वामी रामूची हाजिरीघेतात: " काय रे जन्म घेताना बरोबर घेऊन आला होता का ? अरे जाताना तिला बरोबर घेऊन जाणार
होता का? अरे योग होतो पण कधी न कधी तर वियोग तर होणारच."
"अरे आप्तजनांचा वियोग तर होणारच कारण जग असच नश्वर आहे.".
"अरे म्हणुन तर नश्वर चा त्याग करुन ईश्वरा कडे जायला पाहिजे."
रामू स्वीकारार्थी चर्या करतो पण खिन्नपणा नी तिथुन निघतो.
स्वामी हाक मारतात: " अरे एकटा काय जात आहे, या अनुसुयेला कोण नेणार ?"
रामू मागे पाहतो तर काय अनुसूया उभी होती.
अनुसूया सांगते की मी जिथे बसली होती तिथे डोळे लागले आणी डोळे उघडले तेव्हा इथे आलेली होती.
रामुला कळते की आपली प्रपंचाची आसक्ती कमी होऊन आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणुन स्वामींनी ही लीला केली होती.

Sunday, October 16, 2011

(९७) गोष्ट सखुची

सखु नावाच्या एका विवाहित स्त्रीला पांढरे दाग उभरतात. नवरा आणी सासू तिचा तिरस्कार करुन तिला माहेरी पाठवतात.
कितीही वैद्य हकीम केले तरी गुण येत नाही.
एकदिवस सखु देवाला दोष देत बसली होती. तितक्यात तिथे एक साधू येउन तिला अक्कलकोटला जा अस सांगतो.
सखु आपल्या बाबांना घेऊन अक्कलकोटला निघते.
प्रवासात होणाऱ्या त्रासांनी तिचे बाबा कंटाळतात त्यांना हेच वाटायचे की जिथे वैद्य-हकीम काही करू शकले नाही
तिथे एक गोसावी काय करेल.
पण सखुचा विश्वास दृढ होता.
अखेरचे ते अक्कलकोट गाठतात.
स्वामींना सखु आपले घाराणे सांगते ,स्वामी तिला एक पांढरा दगड देउन तोंड धुताना डागावर घास असे सांगतात.
सखु तसेच करते. तिचे बाबा डागाच्या जागेवर घाव होईल असं सांगून तिला परावृत्त करतात.
पण सखु स्वामी आज्ञेचे पालन करते.
पाहत-पाहता काही दिवसांनी सखुचा दाग पूर्णपणे बरा होतो.
ती स्वामींचे आभार मानते.
स्वामी बोध करतात: "कर्माचे फळ भोगावे लागतात, ते सुटत नाही पण गुरु त्या भोगाची तीव्रता कमी करतो.
"मनुष्याला सन्मार्गाचा रस्ता दाखवतो."
"झालेल्या  वाईट कर्माचे प्रारब्धात परिवर्तन  होण्याआधी त्यांना उपसनेनी नष्ट करा."
सखुचे वडील स्वामींवर अविश्वास दाखवल्या बद्दल क्षमा मागतात.


 

(९६) गोष्ट चीमाच्या गडूची

रामचंद्र नावाच्या एका भक्ता कडे स्वामी येतात. तिथे जाऊन ते चक्क विहिरीच्या पाळीवर जाऊन बसतात.
रामचंद्राची मुलगी चीमा स्वामींना एका गडूत पाणी आणुन देते, स्वामी पाणी पिऊन गडू विहिरीत टाकतात.
तो गडू चीमाचा आवडता होता. ती स्वामींना विचारते: " गडू का विहिरीत टाकला?"
स्वामी म्हणतात:" गडू पाहिझे तर जा विहिरीत आणी काढ."
चीमा काही विचार न करता विहिरीत उडी मारते.
विहीर १०० हात खोल होती. तिच्या आईवडिलांचा जीव कासावीस होतो.
ते मदतीला लोकांना बोलावतात.
स्वामी म्हणतात: " ती आपल्या मर्जीनी गेली आणी आपल्या मर्जीनी परत येईल. "
काही वेळानी चीमा आपोआप विहिरीतून बाहेर येते.
स्वामी बोध करतात: " गुरुवर विश्वास ढळ असावा काहीही झाले तरी गुरु आपल्यासाठी जे करणार ते हिताचेच असणार
अशी भावना असावी."
रामचंद्र आपली चुक मान्य करुन स्वामी चरणी मस्तक ठेवतो.

(९५) मृत्युपासून सुटका

शास्त्रीबुवा काशीचे प्रकांड ज्योतिषी होते. लग्नाचे अनेक वर्षे झाले तरी त्यांना अपत्य झाले नव्हते.
काही काळ लोटल्यावर त्यांना अपत्य प्राप्ती होते- तीही दत्त जयंतीच्या दिवशी.
पण शास्त्री बुवांच्या चर्येवर विशाद पसरला होता. कारण त्यांनी त्याची कुंडली मांडुन तो अल्पायुषी आहे असे जाणले होते.
कुंडली प्रमाणे वयाच्या आठव्या जन्मदिवसा वर मुलाला देवाज्ञा होणार होती.
जशे-जशे मुलाचे वय वाढत होते, शास्त्रीबुवांची बैचेनी वाढत होती.ते श्रीधर च्या आयुष्यासाठी कठोर अनुष्ठान करतात.
त्यांना देववाणी होते की अक्कलकोटला स्वामी समर्थ यांच्या कडे जायची..
शास्त्रीबुवा आपल्या परिवारासह अक्कलकोटला जातात. स्वामी त्यांची राहण्याची व्यवस्था करवतात.
दत्त जयंती येणार होती. सर्व जन आनंदात होते पण शास्त्रीबुवा अत्यंत चिंतीत होते,
कारण दत्त जयंतीच्या दिवशीच त्यांचा मुलगा श्रीधरला याला देवाज्ञा होणार होती.
दत्त जयंतीच्या दिवशी स्वामींची पाद्य पूजा झाल्यावर श्रीधर धरतीवर कोसळतो, त्यचे हात-पाय गार पडायला लागतात.
शास्त्री बुवा स्वामींची करुणा भाकतात. स्वामी शिष्याकडून काळे उडीद मागवतात.
शास्त्रीबुवांचा  तर थरकम्पच सुटतो कारण काळे तीळ अंतिम संस्कारात लागतात.
स्वामी तिळात साखर घालुन श्रीधरच्या तोंडात घालतात.
श्रीधर खाडकन उभा राहतो.
 मग स्वामी त्याला घ्यायला आलेल्या यमदूताना एक सुकलेले झाडाला घेऊन जा अशी आज्ञा करतात.
झाड जमिनीवर कोसळते.श्रीधरचे गंडांतर टळतो.

(९४) स्वामी तारणहार

सावित्री नावाची एक स्वामीभक्त स्त्री होती. तिला पोट दुखीची बाधा होती, केव्हाही तिचे पोट दुखायचे आणी ती बेजार व्हायची.
एक दिवस तिच्या घरी स्वामी यायचे असतात,त्या दिवशी पण तिला पोट दुखीचा त्रास होतो.
पण ती सहन करते तोंडानी स्वामींशी काहीही बोलत नाही.
भोजन झाल्यावर खुद्द स्वामी विचारतात की काही म्हणायचे किंवा अपेक्षा आहे का, पण सावित्री बाई काहीही म्हणत नाही.
त्या दिवशी रात्री सावित्रीबाईना पुन्हा वेदनेची लहर येते, या वेळेला वेदना इतकी तीव्र होती की सावित्रीबाई वैतागून उठते.
आणी त्याचं अवस्थेत विहिरीवर जीव द्यायला जाते. स्वामींना अंतर ज्ञानांनी ते कळते आणी ते शिष्यांना तिला अडवायला पाठवतात.
शिष्य सावित्री बाईंना स्वामी समोर आणतात.
स्वामी म्हणतात: " कोणताही दुखद भोग मनुष्याला आपल्या मागच्या कर्मा मुळे प्राप्त होतो, आत्महत्या हा त्यावर तोडगा नाही,
मागचे कर्म तर नष्ट होत नाही उलट आत्मघात करण्याचे पातकाची सुद्धा त्यात भर पडते."
"भोगला भोगून किंवा उपसानेनी जाळून नष्ट करायचा असतो."
मग स्वामी पुजारी बुवा कडून वाटलेली सुंठेची पूड सावित्रीला देतात.
ती पूड खाल्या बरोबर सावित्री बाईची पोटदुखी कायमची दुर होते.

Saturday, October 8, 2011

(९३) गोष्ट अब्दुल्लाची

अब्दुला नावाचा एक मुस्लीम व्यक्ती पोलीस खात्यात जमादार होता.तो अनन्य स्वामीभक्त होता.
त्याचे नौकरीचे अगदी शेवटचे काही वर्ष उरले होते.
एकदा काही दुर्दांत कैद्यांना पलीकडच्या गावात तहसीलदाराच्या कचेरीत न्यायचे होते.
त्या कैद्यातला एक कैदी अब्दुलच्या हातावर तुरा देउन पळतो.
अब्दुल त्याचा पाठलाग करतो. खूब शोधले तरी तो कैदी सापडत नाही.
अब्दुल मनोमन स्वामींची प्रार्थना करतो: "पूर्ण नौकरी अगदी बेदाग झाली आता शेवटच्या टप्प्यावर दाग नको ,
जर हा कैदी मिळाला तर
नौकरीतून राजीनामा देउन स्वामी सेवेत आयुष्य घालीन."
काही वेळानी एक तेजस्वी व्यक्ती येउन तो कैदी त्याच्या स्वाधीन करतो.
कैदी सांगतो: " हा कोणी तरी विलक्षण व्यक्ती होता आम्हाला साधा प्रतिकार सुद्धा करता नाही आला ,
जसे त्यांनी आम्हाला आणले तसेच आम्हाला यावे लागले."
अब्दुलला कळते की खुद्द स्वामीनी येउन कैदी आपल्या स्वाधीन केला आहे.
अब्दुल आपल्या वचनाचा पक्का होता.
तो नौकरीचा राजीनामा देउन स्वामी सेवेत येतो.
तो स्वामींच्या चरणी सेवा करीत राहिला. पुढे तो सिद्ध पुरुष झाला.
स्वामींनी त्याला पूजेसाठी आपल्या पायातील एक जोडा दिला होता. त्याच पादुका समझून तो पूजा करी.
रोगी व व्याधीग्रस्ताना तो चर्म पादुका खालची माती देई व त्या प्रसादाने त्यांचे रोग बरे होत होते.
अनेक ब्राह्मण ही त्या सिद्ध पुरुषाला वंदन करीत.
हा औलिया आला की स्वामी म्हणायचे ,"आवो पीर साहेब !"
त्यांनी मैन्दर्गीस स्वामींचे मंदिर बांधून तेथे पुजेची व्यवस्था ब्राह्मणा करवी केली. त्याला वाचा सिद्धी पण मिळाली होती.

(९२) नागु अण्णांना दिली दृष्टी

नागू अण्णा मोरगाव चे एक गृहस्थ होते. त्यांची एकाएक नेत्र ज्योती मंद होऊन ते अंधत्वाला प्राप्त होतात.
नोकरी जाते, साठवलेले अन्न किती दिवस पुरणार, ते गरीबिनी गांजले जातात.
ते तुळजापूरच्या भवांनी माते कडे जाऊन तिला साकडे घालतात आणी कठोर उपासना करतात.
देवी त्यांना साक्षात्कार देउन अक्कलकोटला स्वामींच्या शरणी जा अस सांगते.
स्वामी नागू अण्णाला पंढरपूर ला जा अशे सांगतात.
अंध नागू अण्णा कशे-बशे प्रवास करत पंढरपूरला पोह्चतात.
त्यांना तिथे एक व्यक्ती भेटतो, तो आपले परिचय नेत्र वैद्य म्हणू देतो.
तो नागू अण्णाला एका झोपडीत नेऊन त्यांच्या डोळ्यावर शस्त्र क्रिया करुनपट्टी बांधतो.
मग तो म्हणतो: " नागू अण्णा आता तुम्ही विश्रांती घ्या, सकाळी  स्वताच आपल्या डोळ्यावरील पट्टी उघडा. मीआता निघतो"
दुसऱ्या दिवशी नागू अण्णा आपली पट्टी उघडतात तर त्यांना सर्व पूर्वी प्रमाणे दिसते.
ते विचार करतात की आता त्या नेत्र वैद्याच्या पायावर एकदा डोक ठेऊ आणी मगच परत जाऊ.
पूर्ण गाव शोधले तरी त्यांना कोणी नेत्र वैद्य सापडत नाही.
संपणार तरी कसा, त्या वेळेला डोळ्याचे डॉक्टर सुद्धा नसायचे वैद्य आणी तोही शस्त्र-क्रिया करणारा कुठून भेटणार?
त्यांना कळते की स्वामीनी खुद्द येउन त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली असावी.
ते लगबगीनी अक्कलकोटला येतात.पहिले आभार मानतात मग म्हणतात अहो स्वामी तुम्ही इथेच का नाही माझे डोळे बरे केले हो?
स्वामी म्हणतात: " प्रत्येकाची भोग संपण्याची वेळ आणी ठिकाण ठरलेले असतं, त्या शिवाय कुणाचे ही भोग संपत नाही."
नागू अण्णा स्वामींच्या चरणी मस्तक ठेवतात.

विशेष: या गोष्टीत विशेष म्हणजे स्वामींनी नागू अण्णाच्या डोळ्याचे operation केले. आपले खगेश नावाचे सभासद आहे,
 त्यांचे गुरुजी यांचे पण स्वामींनी operation केले होते, ते पण स्वामीनी भौतिक देह त्याग केल्या नंतर.
खगेश चे गुरुजी कान्हेरे गुरुजी आहे, मागच्या बातमी पर्यंत तरी ते पुण्यात राहत होते.
ही गोष्ट पण ' स्वामीनी  केले operation" या topic मध्ये लिहिलेली आहे.
रामदास स्वामींच्या मातोश्रींना पण अंधत्व आले होते आणी समर्थांनी त्यांच्या डोळ्यावर हात फिरवून दृष्टी दिली होती.
(त्यांच्या आईला वाटले की मुलगा काही चेटकी विद्या शिकून आला आहे.
यावर रामदास स्वामीनी काव्यात दिलेले उत्तर जग प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे भुताचे नादी लागलो खरे
पण राम नावाच्या भुताच्या नादी लागलो.)
पण समर्थ स्वामींची तर कमाल आहे चक्क operation करतात.

Sunday, October 2, 2011

(९१) स्वामीनी केली कर्जापासून सुटका

सोलापूर मध्ये राहणाऱ्या एका गृहस्थाची ही कथा आहे. विशेष म्हणजे काही वर्षा पूर्वी झालेली ही घटना
आहे.
एक गृहस्थ होता. घराच्या कर्जाचे हप्ते फेडता न आल्यानी बँक त्याचे घर जब्त करणार होती.
तो कंपनीत कर्जा साठी अर्ज करतो पण लोन पास होत नाही
आणी उलट जागतिक मंदीमुळे त्याला नारळ मिळतो.
नोकरी गेली आता घर जाऊन आपण सडकेवर येणार या भितीनी तो आपल्या मुली आणी बायकोला घरी सोडुन
वाटेल त्या वाटेला पळून जातो.
एका बागेच्या बाकावर तो हात-पाय गळुन बसला होता, तितक्यात एक रुबाबदार सुट घातलेला माणूस मोटारीतून उतरतो आणी
स्वामींच्या मंदिराचा रस्ता विचारतो.
नंतर तो श्रीमंत माणूस आपुलकीनी त्याच्या चिंतेचे कारण विचारतो. तो गृहस्थ आपले सर्व वृतांत सांगतो.
श्रीमंत व्यक्ती त्याचे सांत्वन करुन त्याला बोध करतो:
"मार्ग कधीही संपत नाही मनुष्याचा शोध संपतो "
"अरे आपले दुख किती मोठे आहे हे जगाला न सांगता, दुखाला सांग की माझा देव किती मोठा आहे"
दुखत असलेल्या माणसाला कितीही कोणी सम्झावले तर फारसे पटत नाही. श्रीमंत माणूस जातो पण त्याची ब्रीफ केस राहुन जाते.
तो गृहस्थ ओरडून श्रीमंत व्यक्तीला थांबवतो पण तो श्रीमंत माणूस कार मध्ये बसून निघून जातो.
गृहस्थ मागे परततो तेव्हा त्याच्या हातातून ब्रीफकॅस पडते आणी उघडते, गृहस्थ पाहतो तर काय त्यात पैशे होते.
तो एका निर्जन  स्थानी पैशे मोजतो तर काय नेमके तेवढेच पैशे जेवढे त्याचे कर्ज होते.
तो त्या श्रीमंत व्यक्तीला आठवतो तर त्याचा चेहरा-मोरा फार काही स्वामी सारखंा होता. त्याला कळतं की स्वामीच
श्रीमंत व्यक्तीच्या रुपात येउन त्याची मदत करुन गेले आहे.
तो घरी परततो. तेव्हा बँक त्याच्या बायको-लेकीला घराबाहेर काढून घर सील करत होतं,
तो बँकेच्या माणसाला पैशे देउन घराचा ताबा मिळवतो.
जेव्हा बायको-लेकीला सर्व वृतांत सांगतो, तेव्हा दोघींनाही गहिवरून येत.
ते अनन्य भावांनी स्वामींच्या फोटोला नमस्कार करतात.

(९०) गोष्ट इच्छा भोजनाची

दामाजी आणी तुळसा एक जोडपे होते. ते अत्यंत दरिद्री असले तरी त्यांना स्वामींना भोजन करावायचे होते.
ते शिधा घेऊन स्वामींकडे येतात.
स्वामी त्यांना आम्ही चर-चरात आहे असं सांगुन धर्मशाळेत जेवण तैयार करुन चार ब्राह्मण वाढ, असे सांगतात.
दामाजी चार ब्राह्मणांना जेवण घालतो.
आता त्यांच्या कडे तीन पत्रावळी इतकेच अन्न शिल्लक उरते. एक पत्रावळ स्वामींना देउन
नंतर आपण भोजन करू असे ते ठरवतात.
तितक्यात एक हिंदी भाषी बिहारी ब्राह्मण येउन जेवणाची इच्छा प्रगट करतो.
दामाजी त्याला एक पत्रावळभर अन्न देतो.
पण तो पूर्वी ब्राह्मण जेवणाचा पक्का होता. तो अजून जेवण मागतो.
दामाजी दुसरी पत्रावळ पण देतो.
ब्राह्मण तरीही अन्न मागतो.
शेवटी दामाजी त्याला शेवटची उरलेली पत्रावळ पण देतो.
ब्राह्मण तृप्त होतो आणी जाता-जाता त्यांना  पत्रावळीतली काही भजी प्रसाद म्हणून देतो.
दामाजी आणी तुळसा स्वामींचे दर्शन करुन प्रसाद ग्रहण करू अशे ठरवतात.
स्वामी त्यांना पहिल्या बरोबर म्हणतात: " अरे पेट भर भोजन कराया पर भजीये में नमक कम था."
दामाजी आणी तुळसा भजी खातात तर खरच मीठ कमी होते.
त्यांची खात्री पटते की स्वामी बिहारी ब्राह्मणाच्या रुपात येउन अन्न ग्रहण करुन गेले होते.
तितक्यात नारायण शास्त्रीनी पाठवलेली दोन इंग्रज अधिकारी स्वामींची उगीच्ची शहा-निशा करुन चमत्कार दाखवा असा हट्ट करतात.
स्वामी फाडकन म्हणतात: "पहिले एकमेकांच्या बायका बरोबर झोपणे बंद करा मग या आमची चोकशी करायला या."
आपले गुपित स्वामी जाणुन आहे हे कळल्यावर इंग्रज अधिकारी मान खाली घालुन चालते होतात.

(८९) गच्छत: स्खलनं क्वापी, असे मानुनी नच हो कोपी

पांडुरंग एक उत्तम दर्ज्याचा सोनार होता पण तो जमीनदाराच्या कर्जामुळे गांजला होता. कर्ज न फेडता आल्यानी त्याचे घर जब्त
होणार होते. पण कितीही संकट आले तरी तो स्वामींचे नामस्मरण सोडत नव्हता.त्याचा ठाम विश्वास होता की नाम स्मरणानी
त्याचे भोग संपतील.
अश्या परिस्थितीत त्याला सावकारा कडून दागिने करण्यासाठी आगाऊ रक्कम मिळते.
पांडुरंगला कुबुद्धी होऊन तो चांदीचे दागिने करतो आणी सोन्याचे पाणी चढवून देतो.
आणी वाचलेल्या पैश्यांनी जमीनदाराचे कर्ज फेडतो.
पण खोटे काम किती दिवस लपणार, सावकार त्याला अटक करवतो.
न्यायाधीश त्याला १०० फटक्याची शिक्षा ऐकवतो.
शिपाई फटका घेऊन पांडुरंग सोनारावर  मारतो पण काय त्याच्या पाठीवर लागायच्या आधी फटका फुलाच्या माळेत
बदलतो.
तितक्यात तिथे स्वामी प्रगट होतात.
स्वामी पहिले तर पांडुरंगाची चांगलीच हाजेरी घेतात मग म्हणतात :
"पांडुरंग तु अपराध जरी केला तरी अपराधाच्या तीव्रते पेक्ष्या तुझी भक्ती  जास्त होती, म्हणुन आम्हाला यावे लागले."
मग स्वामींच्या दृष्टीनी चांदीचे दागिने पूर्णपणे सोन्याचे होतात.
स्वामी पुन्हा बोध करतात:" भोग संपवण्या करता वाईट मार्गाचा वापर करू नका तात्पुरते भोग संपले तरी जास्त तीव्रतेनी
ते परतणार."
पांडुरंग आपली चुक मान्य करुन अनन्य भावांनी स्वामी चरणीलीन होतो.

Sunday, September 25, 2011

(88) चोळप्पाच का?

अखेर नारायणशास्त्री  स्वामींच्या सामोरे येतात.
ते स्वामींना फटकळ पणे विचारतात की फार दंत कथा ऐकल्या आहे तुमच्या बद्दल, काही चमत्कार करुन दाखवा.
स्वामींच्या प्रत्येक चमत्कारा माघे काही विशिष्ठ हेतू असायचा त्या अतिरिक्त स्वामींनी कधीही चमत्कार दाखवले नव्हते.
नारायणशास्त्रीला ही चमत्कार दाखवणे त्यावेळी स्वामीनी गरजेचे समजले नाही. आणी प्रांजळपणे 
मी सामान्य माणूस आहे असे म्हणुन टाळतात.
नारायण शास्त्री स्वामींना बोल बोलत गर्वाने तिथुन निघतात.
अहमद एका गावकऱ्या बरोबर जाऊन नारायण शास्त्रींना जाब विचारतो. कुटील नारायण शास्त्री त्यांना भ्रमित करतात.
नारायण शास्त्री:- "अरे गुरूंना सर्व शिष्य समान असायला हवी मग स्वामी चोळप्पा- चोळप्पा कशाला करतात?"
"चोळप्पा त्यांना पोसतो म्हणुन स्वामींनी त्याला विशेष दर्जा दिला आहे."
शिष्य या तर्काच्या आहारी जातात.
ते स्वामींना जाब विचारण्यासाठी येतात.
स्वामी त्यांना आपल्या बरोबर या असे सांगतात.
चोळप्पा बरोबर सर्व लोकं स्वामींच्या मागे जातात.
स्वामी काटेरी रस्त्यात शिरतात चोळप्पाला वगळून सर्व शिष्य थांबतात.
काही दुर जाऊन स्वामी परततात आणी म्हणतात :-" ह्या साठी आम्हाला चोळप्पा प्रिय आहे."
"खरा शिष्य कितीही अडचणी आल्या तरी गुरुची साथ सोडत नाही,सर्व शिष्य मान खाली घालतात. त्यांना आपली चुक कळते."
स्वामी म्हणतात: "अरे चोळप्पाचे आणी आमचे नाते जन्मा-जन्मा पासुन आहे."
" शिष्याला गुरु प्रती श्रद्धा, निष्ठा आणी भक्ती पाहिजे."
"आणी चोळप्पा मध्ये हे सर्व गुण असल्यामुळे चोळप्पा  आम्हाला प्रिय आहे."


(८७) मीपणाचा त्याग

स्वामी नृसिंह सरस्वती चे अवतार आहे, हे नारायण शास्त्रींना फारसे पटत नाही.
मार्तंड मंदिराचा पुजारी त्यांना अक्कलकोटला जाणाऱ्या रामदासी बुवांची ओळख करुन देतो.
शास्त्रीबुवा महंता बरोबर अक्कलकोटला निघतात.
रामदासी बुवा एका मठाचे महंत होते.
 फार विद्वान चतुर्वेदी ब्राह्मण पण फार गर्विष्ठ.
वेद शास्त्रार्थात  चांगल्या-चांगल्यांचा पराभव  करायचे मग त्यांना शिक्षा म्हणुन आपले पायताण डोक्यावर घेऊन उभे ठेवायचे.
एक दिवस स्वामी तिथे येउन मुक्कामाची परवानगी मागतात. मठात जागा नसते म्हणुन ध्यान-कक्षात
फक्त एका तासा साठी त्यांना परवानगी देतात.
स्वामी तिथे गाढ झोपतात.
एका तासानी महंत येतात आणी स्वामींना उठवतात पण स्वामी काही उठत नाही.
स्वामींची अद्दल घडवायला, महंत बुवा खोलीला बाहेरून ताळा लावून जातात.
स्वामी मठात आहे म्हणुन दर्शनाला स्वामीभक्त गोरे शास्त्री येतात.
महंत त्यांना सांगतात की त्यांनी स्वामींना खोलीत डांबून ठेवले आहे.
गोरेशास्त्री समाझवतात की स्वामी चैतन्य आहे व कोणीही त्यांना अशे डांबून ठेऊ शकत नाही.
पण महंत काही ऐकत नाही.
गोरे शास्त्री स्वामींच्या खोलीच्या दाराबाहेर खिन्न मनानी बसून राहतात.
तितक्यात दारातून एक ज्योती बाहेर पडते. गोरेशास्त्री त्या जोतीच्या मागे जातात.
पुढे एक सरोवर येतं. ज्योती सरोवरात लुप्त होते आणी त्याजागी स्वामी सरोवरात सुर्याला अर्घ्य देत असतात.
महंत तिथुनच जात असतात.स्वामींना बघून महंत अगदी थबकतात.
 स्वामी बाहेर येतात. महंत आणी गोरे बरोबर स्वामी पुन्हा मठात येतात.
महंत खोलीचे दार उघडतात तर तिथे स्वामी गाढ झोपलेले दिसतात. आणी त्यांचा बरोबर स्वामी उभे पण असतात.
एका बरोबर स्वामींचे दोन रूप पाहुन महंत शरण येतात.

स्वामी शिकवण देतात-" शास्त्री  बुवा, तुम्ही ज्ञानी आहा पण अहंकार तुमच्या प्रगतीत बाधक आहे. "
"अहंकारणी राग येतो आणी राग राखेत मिळवतो."
"प्रकाशाला कोणी कोंडू शकत नाही."
"ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असते कारण ज्ञानात अपेक्षा असते पण भक्ती निरपेक्ष असते."
महंत बुवा चूक मान्य करुन स्वामी भक्त बनतात.

(८६) स्वामी प्रगट झाले

मार्तंड मंदिराचा पुजारी स्वामीच नृसिंह सरस्वती महाराज आहे अशे नारायण शास्त्रींना सांगतात.
श्री नृसिंहसरस्वती महाराज भक्तांकडून शेवटचा निरोप घेतात. भक्तांना फार दुख होतं.
त्यांचे सांत्वन करायला ते म्हणतात: " अरे दत्त परंपरा ही निर्गुण परंपरा आहे, वडाच्या पारंब्या जमिनीत जाऊन नवीन वृक्ष तैयार
होतो तशेच आम्ही विभिन रुपात अवतरत राहतो.
पुढे कलीयुगाचा अमल फार वाढणार आहे पण तो भक्तिमार्गाची कास धरणाऱ्या लोकांना नडणार नाही.
भक्तांना अभय द्यायला आणी अभक्तांना भक्तिमार्गाला लावायला आम्ही पुन्हा येऊ.
अस म्हणुन नृसिंह सरस्वती महाराज नावेनी नदीच्या दुसऱ्या तीरावर जाऊन कर्दळीवनात दृष्टीआड होतात.
३०० वर्षानंतर उद्धव नावाचा एक लाकुडतोड्या कर्दळी वनात लाकूड तोडायला जातो.
झाड कापता कापता त्याच्या हातातून कुऱ्हाड सुटून एका भल्या मोठ्या वारुळावर आढळते.
कुऱ्हाड घ्यायला तो वारूळा जवळ जातो तर तो पाहतो तरी काय- वारुळातून रक्त येत होते.
उद्धव जाम दचकतो. तितक्यात एक भव्य व्यक्ती वारुळाला भेदून बाहेर येते.तिच्या मांडीतून रक्त वाहत होते.
उद्धव गया-वया करुन चुकून झाले असे म्हणतो.
भव्य व्यक्ती उद्धवला अभय देते आणी म्हणते:-" उद्धव हे तुझ्या हातून घडणारच होते, तु काही खंत मानु नको."
"तुझ्या हातून जग-कल्याणाची मोहिमेचा श्रीगणेश झाला आहे."
ती व्यक्ती आणखी दुसरी कोणी नसून स्वामी समर्थ असते.
स्वामी कर्दळीवनातुन कलकत्याला कालिका मातेचे दर्शन करुन गंगा तटावरून हरिद्वार करत गोदावरी नदी,
हैदराबाद,मंगळवेढा,पंढरपूर होत सोलापूर ला येतात.
सोलापूरला काही दिवस चिंतोपंत टोळ कडे मुक्काम करुन स्वामी अक्कलकोटला येतात

Sunday, September 18, 2011

(८५) रिकाम्या चिलीमीच दम

नारायण शास्त्री अक्कलकोट मध्ये मार्तंडाच्या मंदिर समोर येतात.
मंदिराचा  पुजारी त्यांना सांगतो अक्कलकोटची यात्रा या मंदिरापासूनच सुरु होते.
पुजारी या मागचे कारण सांगायला पूर्व-वृतांत सांगतो.
सोलापूर मधले चिंतोपंत टोळ यांचा  कडून स्वामी कुणालाही काही  न सांगता निघून जातात.
अक्कलकोटला ते मार्तंड मंदिरा समोर बसून राहतात. कुणी त्यांना काहीही आगत्याचे तर विचारात नाही उलट शंका-कुशंका करतात.
स्वामी ३ दिवस एकाच जागेवर बसून राहतात.
एक गावकरी गावाच्या  राखणदार अधिकारी अहमदला स्वामींना गावातून हकल अशे सांगतो.
अहमद येतो, स्वामी फक्त एका लंगोटीत होते, काही तरी असंबद्ध हातवारे करत होते.
अहमदला थट्टा-मस्करी करायची सुचते.
अहमद: " बाबाजी चिलीम पियोगे?"
स्वामी: "क्यो नही?"
अहमद स्वामींना अगदी खाली चिलीम देतो.
स्वामी त्या चिलीमीतुन  आर-पार पाहतात आणी मग हातावर आपटून त्यात असलेले काही तंबाखूचे कण सुद्धा काढून टाकतात.
मग दोनी हातांच्या पकड मध्ये चिलीम धरुन स्वामी चिलीमिचा दम मारतात, पाहता पाहता त्या रिकाम्या चिलीमी तुन धूर निघतो.
अहमद तर गारठून जातो.तो स्वामींची करुणा भाकतो.
अहमद: " आप तो औलिया हो !"
स्वामी विचारतात की चोळ्या कुठे राहतो.
अहमद त्यांना चोळप्पाच्या घरी नेतो.
स्वामी चोळप्पाच्या घरीच मुक्काम करतात.

(८४) ईश्वरीय देणगीचा बाजार मांडू नये

नारायण शास्त्रींना रस्त्यात एक महंत भेटतात. महंत त्यांना आपली कहाणी सांगतात.
त्रिविक्रम क्षेत्री नारायण सरोवराची फार प्रचीती होती.
त्यात आंघोळ केली तर मागच्या सात जन्माचे पापं फिटतात अशी मान्यता होती.
पण एका महंतांनी त्यावर आपला ताबा घेतला होता. सरोवरात आंघोळ करणाऱ्यांकडून तो कर घ्यायचा.
ज्यांना  कर देता येत नव्हता त्यांना तो सरोवराजवळ  फटकू सुद्धा देत नव्हता.
एकदा अशाच वृद्ध गरीब माणसाला तो गड्यानमार्फत हकलतो. तितक्यात स्वामी तिथे येउन त्याला जाब विचारतात.
महंत त्यांचाशी पण दुरुत्तर करतो.
स्वामी म्हणतात: " हम कोई कर नही देंगे और स्नान करेंगे."
स्वामी सरोवरा कडे जातात. महंताचे गडी त्यांना अडवणार त्याआधीच स्वामी अदृश्य होतात.
काही वेळानी महंत पाहतो तर काय , स्वामी चक्क सरोवराच्या  मधो-मध पाण्यावर बसले होते.
स्वामींच्या अधिकाराची प्रचीती महंताला येते. तो शरणागती पत्करतो.
स्वामी म्हणतात: " अरे ईश्वरानी बनवलेल्या सर्व काही, सर्वांचे  असते त्याच्यावर अधिकार गाजवू नये.
तीर्थस्थळी असा बाजार मांडुनलोकांचा छळ करू नये "
महंत आपली गादी बंद करतो. त्यानंतर नारायण तीर्थात कोणचेही कर आकारणे बंद झाले.
महंत पुढे स्वामी-संदेसचा प्रचार करायला लागला.

(८३) ईश्वर चरा-चरात आहे

नारायण शास्त्रींना रस्त्यात जनी नावाची एक बाई भेटते.
जनी भोळी-भाबडी पांडुरंगाची भक्त असते.
एकदा स्वामींच्या मुखातून पांडुरंग नाव ऐकुन ती स्वामींच्या जवळ येते.
स्वामी म्हणतात: "दत्त नगर मुल पुरुष वडाचं झाड यजुर्वेदी ब्राह्मण नाव नृसिंह भान कश्यप गोत्र रास मीन "
जनीला काही बोध होत नाही पण कोणी तरी सिद्ध पुरुष म्हणुन ती स्वामी-सेवा प्रारंभ करते.
जनी दर आषाढी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जायची.
ती स्वामींची आज्ञा घेऊन या वर्षी पण पंढरपूर ला जाते.
जाताना स्वामी म्हणतात: " आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहो, आम्हाला हाक मार आम्ही येऊ"
पंढरपूरच्या सीमेवर जनी येते. तेव्हा हत्तीच्या सोन्डीचा पाऊस सुरु होतो.
जनीला मंदिरा पर्यंत जाता येत नाही. संध्याकाळ झाली तरी पाऊस थांबला नव्हता.
आपला ३५ वर्षाचा नियम तुटेल म्हणुन जनीला रडू येतं.
ती मनोमन स्वामींची  प्रार्थना करते, स्वामी तिच्या समोर प्रगट होतात.
आश्चर्याचा धक्का बसलेली जनी कशीतरी आपली व्यथा सांगते.
स्वामी म्हणतात की देव काही मंदिरातच नाही, देव चरा-चरात आहे.
तु त्याला हाक मार तो तुझ्या समोर प्रगट होईल.
जनी तसच करते, डोळे उघडते तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात पांडुरंग उभा आहे.
जनी मनसोक्त आपल्या डोळ्याचे पारणे फिटवते.
थोड्यावेळानी पांडुरंगाच्या जागेवर स्वामी दिसतात.
जनीला कळतं की स्वामीच तिचा पांडुरंग आहे आणी तो जवळ असतांना ती उगीच इतके कष्ट करुन इथे आली.
ती स्वामींच्या चरणात अनन्य भावांनी  लीन होते. 

Monday, September 12, 2011

(८३) उंदीरास जीवनदान

शास्त्री पुढे निघतात, रस्त्यात त्यांना मोरोपंत नावाचा एक राजपुरोहित एक वृतांत सांगतो.
गणेश चतुर्थीचा दिवस होता.राजमहालात गणपती बसवायची पूर्ण तैयारी झाली होती.
मोरोपंत राजाची  वाट पाहत असतात. तितक्यात तिथे एक  उंदीर येऊन थैमान घालतो.
काहीही केल्या तो पकड मध्ये येत नाही.
राजा देवघरा कडे येतात तर पहातात की स्वामी आलेले आहे.
आता स्वामींशी बोलावे की गणपती स्थापना करायची, स्वामी त्याला गणपती स्थापना कर अशेसांगतात.
स्वामी बाहेर झोपाळ्यावर बसतात.
राजा पुजेला बसतो, उंदीर पुन्हा येऊन मोरोपंतांना नडतो.
मोरोपंत हातातले चंदनाचे खोड नेम धरुन उदिंराला मारतात. उंदीर प्राण सोडतो. शिपाई उन्दिराला बाहेर फेकायला जातात.
स्वामी त्याच्या कडून मृत उंदीर घेतात आणी त्याच्या पाठीवर प्रेमानी हात फिरवतात.पाहता-पाहता उंदीर जिवंत होतो.
सर्व जण थक्क होतात.
स्वामी मोरोपंताला बोध करतात: " अरे सर्व जीवात देव असतो, अरे जीवाचा वध करुन मूर्तीपुजेनी काय देव प्रसन्न होणार का?"
"अरे जर उंदीर त्रास देतो तर त्याला पकडून दुर सोडा पण जीव घेणे योग्य नाही."
"आणी मोरोपंता, रागाला आवरत जा, योग्य वेळेला राग येणे गरजेचे असले तरी शुल्लक गोष्टीवर राग करू नये."
मोरोपंत कधीही राग न करण्याचे प्राण करतात.
स्वामी म्हणतात: " अरे ह्या उंदीराला मनुष्य जन्म घेऊन आमची सेवा करायची आहे,
तो मनुष्य जन्म घेऊन आमची सेवा करेल तेव्हा त्याला मोक्ष मिळेल."
ही कहाणी ऐकुन पण नारायण शास्त्री स्वामी बद्दल अनादारानी बोलतात.
स्वामींच्या बद्दल अनादर दाखवल्या मुळे मोरोपंतांना जाम राग येतो पण ते कशे-बशे रागावर आवर घालतात.
नारायण शास्त्री  आपला पुढचा प्रवास करायला निघतात.

(८२) भाकड गाय दुध देते

रस्त्यात एका धर्म शाळेत नारायण शास्त्रींचा मुक्काम असतो. तिथे त्यांना एक ब्राह्मण प्यायला निशुल्क दुध देतो.
कारण विचारल्यावर तो सांगतो की पौर्णिमेच्या दिवशी तो वाटसरूंना निशुल्क दुध देतो.
नंतर तो आपली कथा सांगतो-
त्याचे नाव कृष्णंभट असतं. त्याच्या  गाय दुध देणे बंद करते. तरी तो तीचं नीट संगोपन करत असतो.
तो, दुसरे काही उत्पन्न नसल्यानी दारिद्रानी गांजलेला असतो.
एकदा स्वामींना तो घरी बोलावतो. त्यांचं पूजन करतो स्वामी नैवेद्य म्हणुन दुध मागतात.
कृष्णंभटला दुध देता येत नाही तो घरी दुध नसल्याचे सांगतो.
स्वामी म्हणतत: " काय रे खोटं कशाला बोलतो ,घरात गाय आहे पण आम्हाला दुध नाही अशे सांगतो."
कृष्णंभट म्हणतो : "अहो स्वामी ती गाय भाकड आहे दुध देत नाही."
स्वामी म्हणतात: " अरे ती गाय दुध देते ,आमच्याशी खोटं बोलतो."
कृष्णंभट स्वामींच्या समाधानासाठी बायकोला गाईचे दुध काढ अशे सांगतो.
दुध येणार नाही तेव्हा स्वामींचे समाधान होईल.
बायको थोडीशी चिडून दुध काढायला जाते, पण काय गाईच्या थनातून दुध येते.
तिला आधी भास वाटतो पण पाहता-पाहता हातातला पेला गच्च भरून जातो.
मोठेभांडे आणले जातात तेही भरतात.
कृष्णंभट आणी त्याची बायको स्वामींच्या चरणात पडतात.
नारायण शास्त्री ना तर आता स्वामी पक्के मांत्रिक वाटतात ते आपला पुढच्या प्रवासाला निघतात.

(८१) निपुत्रिक स्त्रीला पुत्र प्राप्ती

नारायण शास्त्री  पुढे जातात तर रस्त्यात एक लहान मुलगा स्वामी भक्ती करतांना दिसतो. शास्त्री त्याच्या आईला जाब विचारतात
की एवढ्या लहान मुलाला हे काय स्वामी भक्ती शिकवली.
ती बाई सांगते की हा अवधूत स्वामींच्या कृपेमुळेच झाला आहे.
ती आपली कहाणी सांगते.
तीच नाव रुख्मीणी असतं, लग्नानंतर फार वर्षे होऊन ही तिला संतती होत नसते, आणी त्यावर तिला क्षय रोग ही जडतो.
तिच्या नवऱ्याचा मित्र तिला स्वामींकडे आणतो. स्वामी तिला बोरीच्या झाडाची सेवा करायला सांगतात.
मागच्या जन्माच्या कर्मा मुळे हे झालं आहे पण बोरीच्या झाडाची सेवा केल्यानी हे दोष फिटणार.
बोरीचे झाड काही देवीय झाड नाही म्हणुन जोडपं वडाच्या झाडाची  प्रदक्षिणा करतात.
हे पाहून त्यांना स्वामी कडे नेणाऱ्या भक्ताला दुःख होतं आणी तो स्वामींकडे जातो.
स्वामी तिथे बोरीचे रोप लावत असतात. भक्त म्हणतो स्वामी हे रोप मोठे होईल तो पर्यंत रुख्मिणी काही राहणार नाही.
स्वामी म्हणतात की तिच्या साठी मुंबईच्या कामाठीपुऱ्यात कधीचे झाड लागले आहे.
भक्ताला स्वामींच्या वाक्यातली खोच कळते, तो लगबगीने रुख्मीणी कडे येउन स्वामी वचनाचे मर्म सांगतो.
भक्त म्हणतो: "रामाला बोर खाऊ घालणारी शबरी राम मय झाली होती तसेच स्वामी सुत राममय झाले आहे.
बोरीच्या झाडाशी तात्पर्य त्यांच्या मठात सेवा करण्याशी आहे."
रुख्मिणीचा क्षय रोग फार वाढला होता तरी ती कशी-बशी हिम्मत करुन मुंबईच्या मठात जाते आणी सेवा सुरु करते.
तिला तिथे दिवस जातात आणी त्या मध्ये तिला कळत सुद्धा नाही तिचा क्षय रोग केव्हा बरा झाला.
गोपाळ अष्टमीच्या दिवशी जसाच गोपाळ कृष्णाला पाळण्यात ठेवण्यात येतो तेव्हाच तिला पण पुत्र प्राप्ती होते.
त्या मुलाचे नाव अवधूत ठेवण्यात येत.
नारायण शास्त्रीना आता स्वामी कोणीतरी मांत्रिक वाटतो ते स्वामींना भेटायला पुढचा प्रवास करतात.

Sunday, September 4, 2011

(७९) गौतमीचा गौतम झाला

बसप्पा आणी मणब्याचा वृतांत ऐकल्यानंतर शास्त्री बुवा पुढे निघतात.
स्वामी कोणी तरी मांत्रिक असावा असं त्यांना वाटतं. रस्त्यात त्यांना एक व्यक्ती भेटतो, शास्त्रीबुवा थोड्याश्या
तिरस्कारानी त्याला म्हणतात इथे स्वामी समर्थ कुठे भेटतील,फार भाकड गोष्टी ऐकल्या आहे त्यांच्या बद्दल.
तो युवक त्यांना स्वामी महिमा सांगतो तरीही शास्त्रीबुवा म्हणतात:- "अस केले तरी काय आहे, स्वामी समर्थांनी?"
युवक म्हणतो :- " मी कोण आहे?"
शास्त्री बुवा म्हणतात:- "हा काय प्रश्न झाला ? पुरुष आहे तु."
युवक म्हणतो: " हो मी पुरुष आहे माझं नाव गौतम, पण काही दिवसा पूर्वी पर्यंत मी एक स्त्री होतो."
शास्त्रीबुवांना घेरी येत नाही तेवढंच, ते म्हणतात: " काय रे ! डोकं-वोकं तर फिरले नाही ना तुझं?"
गौतम आपला वृतांत सांगतो.
एक सावकार होता, तरुणपणात त्याची बायको वारते.
वार्धक्यपणात त्याला एकांत खायला येतो. संतती नसल्याचे त्याला खंत वाटते.
घर सांभाळणारी एक वृद्ध स्त्री-गडी त्याला दत्तक पुत्र घे असं सुचवते.
सावकाराला पटतं, पण त्याला पाहिजे तसा मुलगा मिळत नाही.
हरी नावाचा गुराखी त्याचा गडी होता.
त्याला ३ मुली होत्या. गरीबिनी मुक्ती व्हावी म्हणुन तो आपल्या लहान मुलीला मुलगा बनवून
सावकाराला दत्तक द्यायचे ठरवतो.
गौतमी त्याची कनिष्ठ कन्या, तिला तर आपल्या स्वामी आजोबाचं वेड.
कुठून-कुठून फुलं वेचून आणायची आणी त्यांची माळ करुन स्वामींना घालायची.
एकदा स्वामी खुश होऊन म्हणतात:-" बाळ काय करू तुझ्या साठी ?"
लहानगी गौतमी म्हणते: " काही नाही फक्त मी जेव्हा हाक मारीन तेव्हा या. "
तिचा उद्देश एवढाच होता की करमत नाही तेव्हा आपल्या लाडक्या आजोबांनी यावे आणी आपल्या बरोबर खेळावे.
स्वामी मान्य करतात.
इकडे हरी, गौतमीला मुला सारखे वागणे शिकवतो, तिला मुला सारखं पोशाख करवतो.
सावकारा कडे काम करणाऱ्या आजी बाईला मिळणाऱ्या पैश्यातून वाटा देईन अशी लालूच  देउन, बिंग न फुटावे याची हमी घेतो.
आजीबाई पण तयार होतात.
मग काय गौतमीला गौतम बनवुन सावकारा कडे पाठवले जाते.
गौतमी चुणचुणीत तर होतीच सावकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर देउन सावकाराचे मन जिंकते.
सावकार तिला मुलगा समझुन दत्तक घेतो.
आजीबाई डोळ्यात तेल घालुन सावधगिरी बाळगतात, म्हणुन गौतमी मुलगी आहे हे बिंग फुटत नाही.
काही वर्षांनी सावकाराला गौतमचे लग्न करुन सूनमुख पाहु असं वाटतं.
मग काय गौतमचे लग्न ठरवले जाते.
आता मात्र गौतमीला घाम फुटतो, तिची सर्व हुशारी घाटावर जाते.
मुलाची आई जेव्हा गौतमीचे पाय धुते तेव्हा पायांची कोमलता आणी चेहऱ्यावर स्त्रीसुलभ भाव पाहून
तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकते.
त्या रोखून गौतमी कडे पाहतात. गौतमीचा धीर जातो.
होणाऱ्या सासुबाई पटकन ओळखतात की गौतमी पुरुष नाही.
त्या फर्रकन गौतमचे पागोटे ओढतात.गौतमीचे  लांब-सडक केस सुटतात.
आता तर गौतमीला गौतम बनवून फसवणूक करण्याचा आळ सावकारावर येतो.
गौतमीचे होणारे सासरे गावाचे कुलकर्णी होते. ते पटकन गौतामीला वनात नेऊन तिचा वध करा असा निकाल देतात.
मग काय गौतमीला वनात नेण्यात येतं.शिपाई वनात तिचा वध करणार त्या आधी देवाची आठवण कर म्हणुन वेळ देतात.
गौतमी कळ-कळुन स्वामींना हाक मारते:-"स्वामी आता शेवटचे तरी भेटा हो!."
गौतमीच्या लहानपणाच्या वचनांनी बांधलेले स्वामी लगेचच तिथे प्रगट होतात.
तिथे ते शिपायांना रागावतात:- " काय रे  या निर्दोष युवकाचा कशाला प्राण घेतात?"
शिपाई म्हणतात:" अहो स्वामी ती फार लबाड स्त्री आहे फक्त वेश पुरुषाचा आहे ."
स्वामी स्मित-हास्य करुन गौतमी कडे पाहतात. स्वामींच्या दृष्टीनी काया-पाळट होऊन गौतमी पूर्ण पणे एका युवकात बदलते"
स्वामी म्हणतात:" अरे मूर्खो वह् पुरुष है, स्त्री नही. "
शिपाई भीत-भीत गौतमीचं परीक्षण करतो तर सर्व लक्षणे पुरुषाची.
ते आता गौतमला घेऊन सावकारा कडे परत जातात, आपण दत्तक घेतलेली संतती पुरुषच आहे म्हणुन तो समाधान पावतो.
सासुरवाडीचे लोकंही संतुष्ट होऊन गौतमला आपली मुलगी देतात.
गौतमच्या मुखातून ही गोष्ट ऐकुन शास्त्रीबुवांच्या कपाळाला घाम फुटतो.
ते स्वामींना भेटायला पुढे जातात पण या वेळेला मनातल्या संकल्प-विकल्पाचे ओझे घेऊन.

(७८) सापाचे झाले सोने

मणब्याचा उद्धार पाहून स्वामींना भेटायला निघालेले शास्त्री एका जागेवर विसाव्या साठी थांबतात.
तिथे एका वृद्द्ध आणी गरीब माणसाला पाणी पाजायला एक श्रींमत माणूस घोड्यावरून
उतरून येतो. तो व्यक्ती त्या म्हाताऱ्या माणसाला पण स्वामी म्हणुन हाक मारतो.
शास्त्रीबुवानी विचारल्यावर तो माणूस आपला पूर्व वृतांत सांगतो.
तो बसप्पा असतो, जातींनी तेली पण प्रपंचात मन लागत नाही.
कोणतेही आजीविकेचे कार्य करायची त्याला इच्छाच होत नाही त्याल सुचते ते फक्त नामस्मरण आणी ईश्वराचे ध्यान.
त्यामुळे घरचे अगदी कंटाळले होते.
आणी कंटाळणार पण का नाही? घरात अन्न नाही, भूखेनी रडणारे मुलं-बाळं.
काहीही झाले तरी बसप्पाला ईश्वर उपासने शिवाय दुसरे कार्य करायचीच इच्छा होत नाही.
चित्त शांत व्हावे म्हणुन तो अनेक साधुंशी भेटला अनेकांना गुरु करू पहिले पण चित्ताला ओळख पटली नाही
या मुळे तो उद्विग्न राहायचा.
एकदा वनात त्याला काट्यांमध्ये झोपलेले स्वामी दिसतात.
काट्या मध्ये शांत पणे झोपणारा माणूस साधारण नसावा ,म्हणुन बसप्पा स्वामींशी संवाद करतो.
बसप्पाला पहिल्या  बरोबर स्वामी म्हणतात;-"काय रे तेल्या! घर संसार सोडुन मोक्ष पाहिझे?"
"अरे अशी जवाबदारी टाकून का पळत आहे?"
"घरच्यांना कोण पाहणार?"
स्वामी अंतर्यामी आहे हे कळल्यावर बसप्पा घट्ट स्वामींचे पाय धरतो.
स्वामी म्हणतात:-"योग्य वेळ आली की तुला बोलावु"
काही दिवसांनी रात्री स्वप्नात दृष्टांत देउन स्वामी बसप्पाला बोलावतात.
बसप्पा येतो पण स्वामी दुर जातात.बसप्पा पण मागे-मागे येतो, स्वामींच्या मागे जातांना काटे लागून बसप्पा रक्त-बंबाळ
होतो, तेव्हा स्वामी थांबतात.
स्वामी म्हणतात: 'हमारे साथ चलना इतना आसान नही है, जावो वापस जावो "
"आपल्या संसाराची काळजी घे."
बसप्पा म्हणतो:" प्रपंच आणी परमार्थ एका बरोबर जमत नाही, प्रपंचात ईश्वराचा विसर होतो"
स्वामी म्हणतात:" अरे रामदास स्वामी म्हणुन गेले आहे- "प्रपंच करावा नेटका .........."
"देव प्राप्तीसाठी पळण्याची गरज नाही लायकी झाल्यावर देव स्वत: भेटायला येईल"
" पुंडलिका कडे पांडुरंग आला, एकनाथ कडे पाणी भरले "
स्वामी पुढे जातात. बसप्पा तसाच लंगडत येतो. या वेळेला स्वामी जिथे थांबतात तिथे चारी कडे सापच-साप होते.
स्वामी म्हणतात :- "आमची एवढी सेवा केली त्या बद्दल तुला काही देऊ."
"पण आमच्या कडे काय आहे ? जा हे साप घेऊन जा . वाट्टेल तेवढे साप घेऊन जा."
बसप्पा थरथरतो.
स्वामी एक साप उचलून देतात,बसप्पा जवळ असलेल्या कपड्याची झोळी पसरवतो आणी त्यात साप बांधून घरी जातो.
रस्त्यात साप सोडुन द्यावा असा विचार येतो पण स्वामींनी दिलेला साप कसा सोडु , असा विचार करुन मुकाट्यानी चालत जातो.
घरी गेल्यावर बायको आशेनी गाठोडीत काय आहे म्हणुन विचारते.
तिला काही म्हणणार त्याआधी बायको गाठोडी हिसकवुन घेते.
उघडते तर काय, त्यात चक्क सोन्याचा साप.
बसाप्पाच्या बायकोनी कधी गुंजभर सोनं पाहिलेले नव्हते, आणी आता तर भला मोठ्ठा सोन्याचा साप.
बसप्पा एका काळी पोरा-बाळांना पोटभर अन्न सुद्धादेऊ शकत नव्हता तो आता गावाचा श्रीमंत माणूस बनतो.
त्या दिवशी पासुन बसप्पा प्रत्येक अडलेल्या-नाडलेल्या व्यक्ती मध्ये स्वामी पाहून त्यांना स्वामी म्हणुन हाक मारायचा.आणी यथासांग मदत करायचा.
बसाप्पाचा असा वृतांत ऐकुन नारायण शास्त्री आणखीच गोन्धलतात आणी नव्या जोमानी अक्कलकोट कडे चालायला लागतात.

(७७) गोष्ट मणब्याची

राम नवमी होती. रामजन्मासाठी गावातले प्रकांड विद्वान नारायण शास्त्रींना बोलावण्यात येतं.
रामजन्माच्या वेळेला केशव सपत्नीक येतो. केशवला पहून शास्त्री बुवाच्या तळपायाची आग मस्तकात जाते.
शास्त्रीबुवा केशवच्या कमरेत लात घालुन पाडून देतात. ते
गड्याच्या हाती केशवला हकलून देतात.
केशवचे सर्व पुत्र जन्मापासून मतिमंद होते, म्हणुन शास्त्री बुवा त्याला पापी समझुन तिरस्कार करायचे.
पण केशव अनन्य स्वामीभक्त होता, कितीही वाईट झालं तरी त्याची स्वामी वर श्रद्धा अढळ होती.
त्यांच्या मते गावात अशे पापी माणसे राहिले तर गावावर गंडांतर येतं.
दुसऱ्या दिवशी शास्त्रीबुवा पंचायत बोलावून केशवला परिवारा सकट गावा बाहेर काढायला लावतात.
सगळ्या गावात शास्त्रीबुवांचा दरारा होता, म्हणुन पंच त्यांच्या इच्छेप्रमाणे निकाल देतात.
गाव सोडुन, आपल्या मतीमंद मुलांना कुठे जाऊ या चिंतेनी केशव परिवारा सकट विषपान करतो.
संध्याकाळी केशव गाव सोडुन गेला की नाही, हे पाह्यला शास्त्री बुवा गावकऱ्या बरोबर येतात.
पाहतात तर पूर्ण परिवार विषप्राशन करुन पडला होता,फक्त मणब्याची नाडी चालत होती.
शास्त्री बुवा मणब्याला वनात सोडायला सांगतात.
गावकरी मणब्याला वनात सोडायला जातात. वनात त्यांना भारदस्त चाहूळ लागते, कोणी तरी हिंस श्वापद
असावं, असं समझुन गावकरी मणब्याला तिथेच सोडुन परततात.
दुसऱ्या दिवशी शास्त्रीबुवा आणी गावकरी मणब्या बद्दल गोष्ठी करत असतात..
शास्त्रीबुवा म्हणतात: "अर्ध्या रस्त्यात मणब्याला सोडले तरी काही काळजी करू नका,
आधीच पोटात विष आहे आणी तुम्ही लोकांच्या
मागे जे श्वापद लागले होते त्यांनीच त्याला खाऊन टाकले असावे.
" नाही... नाही ...., शास्त्रीबुवा तुमच्या दोन्ही गोष्ठी चूक आहे, मी जिवंत आहे."

शास्त्रीबुवा पाहतात तर काय? हे वाक्य मणब्याच्या तोंडाततुन पडले होते.
मणब्या जो आधी बे..बे असा आवाज काढून इशाऱ्यानी बोलायचा तो असं अस्खळीत बोलत होता.
शास्त्री बुवा म्हणतात: "तु जिवंत कसा आणी तु बोलायला कसा लागला?"
मणब्या फाड-फाड बोलून सांगतो की वनात एक साधू आले आणी त्यांच्या कृपेनी मी बोलायला लागलो आणी
माझा मतीमंद पण पण गेला.
गावकरी म्हणतात की असं भेटलं तरी कोण तुला ?
मणब्या ओल्या मातीवर काडीनी रेखा चित्र काढून दाखवतो.
गावकरी पटकन ओळखतात: " हे तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ"
शास्त्रीबुवा दातओठ चावुन राहतात. आता कोणच्याही कारणांनी मणब्याला गावा बाहेर काढता येणार नव्हते.
सर्व लोकं स्वामींचा जय-जयकर करतात.
शास्त्रीबुवा पुन्हा मणब्याला विचारतात " स्वामींनी मग तुझ्या आई-वडिलांना आणी भावांना का नाही वाचवले?"
मणब्या एका विद्वानासारखे उत्तर देतो-" संत निसर्ग नियमात सहसा बदल करत नाही, अगदी विशिष्ट परिस्थिती ला वगळून"
"माझे आई-वडील आणी भाऊ आपल्या गतीला प्राप्त झाले, त्यांच्या साठी हेच उत्तम होते."
"जीवन जगणे हे महत्वाचे नाही जन्म-मरणाच्या चक्रातून सुटणे हे महत्वाचे आहे."
मणब्याच्या काय पालट मुळे शास्त्री बुवांचे डोके एकदम फिरते.
ते मुकाट्यानी असा स्वामी समर्थ आहे तरी कोण हे पहायला अक्कलकोट साठी प्रस्थान करतात.

Sunday, August 28, 2011

अनेक रूप असली तरी देव एकच असतो

रमाकांत नावाचा एक स्वामीभक्त होता. आनंदाचार्य त्याचे गुरु होते, ते जगत फक्त श्रीकृष्णाला मानायचे.
आनंदाचार्य तशे गयेत राहायचे पण त्यांचं सतत  तीर्थाटन चालत राहायचे.
रमाकांत गरीबीनी गांजला होता, सावकाराचे त्याला कर्ज झाले होते.
ते फेडता न आल्यानी तो वैतागला होता.
तो स्वामींकडे, आपल्या गुरुची भेट घडावावी अशी इच्छा व्यक्त करतो.
स्वामी म्हणतात:-" लवकरच तुला तुझ्या गुरुची भेट घडेल."
आनंदाचार्य त्या वेळेला तीर्थाटन करत होते, स्वामी प्रेरणेनी त्यांना रमाकांत ची आठवण होऊन ते स्वत:
रमाकांत ला भेटायला येतात. रमाकांत त्यांना स्वामी कृपेनी भेट घडली असं सांगतो.
आनंदाचार्य थोडेशे खिन्न होतात, कारण त्यांच्या मते जगाचा नियंता श्रीकृष्णाला वगळून रमाकांत एका माणसाची सेवा
 करतो, या गोष्टीचा खंत होतो.
ते रमाकांतला समझवायचा प्रयत्न करतात पण रमाकांत उलट त्यांनाच स्वामी ईश्वर आहे अशे सांगतो.
काही वेळानी सावकाराचा माणूस येऊन रमाकांताशी हुज्जत घालतो.
आनंदाचार्य हसतात की पाहु याचे स्वामी कशे सोडवणार या संकटातून, पण काय रमाकांताचा जुना मित्र येउन कधी तरी उसणे
घेतलेले पैशे रमाकांतला फेडुन संकट टाळतो.
रमाकांत स्वामींचे आभार मानतो हे, ऐकुन आनंदाचार्य चडफडतात.
काही दिवसांनी रमाकांत चा मुलगा याला फणफणून ताप येतो, बाहेर सोसाट्याचा पाऊस पडत असतो.
रमाकांत आनंदाचार्य यांना विनंती करतो की माझ्या मुलाचे रक्षण करा, पण आनंदाचार्य म्हणतात की अरे तुझ्या स्वामींना
हाक मार.
रमाकांत यावेळेला हतबल होतो.
तितक्यात दारावर एक थाप पडते. दार उघडल्यावर एक अनोळखी माणूस आत् येतो.
तो पावसा पासुन बचावासाठी आलो आहे असं सांगतो, आपलं परिचय देताना आपण वैद्य असल्याचे सांगतो.
रमाकांत त्याला आपल्या पोराला वाचवा अशी विनंती करतो.
वैद्य बुवा मुलाच्या कपाळावर हात काय फेरतात की मुलगा लगेच डोळे उघडतो, मग आपल्या बटव्यातून
एक औषध देउन वैद्यबुवा पाऊस थांबला असे सबब देउन जातात.
सकाळ पर्यंत मुलगा खडखडीत बरा होतो.
आनंदाचार्य थोडेशे गोंधळतात. ते आता रमाकांताला बुचकळ्यात पाडण्यासाठी काही ठरवतात.
ते रमाकांताला सुवर्णभस्म युक्त अशी खीरेची मागणी करतात.
रमाकांत कडे साध्या जेवणाचे सुद्धा हाल होते, मग खीर ती पण सुवर्णभस्म युक्त कुठून आणणार?
दो देवघरा कडे जाऊन स्वामींची मनोमन प्रार्थना करतो:-" लज्जा राखी स्वामीराया...."
काही वेळानी डोळे उघडतो तर काय देवासमोर एक वाटी ,त्यात खीर ती पण सुखे मेवे आणी स्वर्ण भस्म भुरकटलेली.
तो स्वामींना मनोमनी धन्यवाद देउन वाटी आपल्या गुरु समोर ठेवतो.
आनंदाचार्य आश्चर्य चकित होतात. रमाकांत त्यांना जेव्हा सर्व वृतांत सांगतो तेव्हा त्यांना गहिवरून येतं.
स्वामी कोणी साधारण मनुष् नव्हे तर पूर्ण ब्रह्मच आहे याची त्यांना खात्री पटते.
आनंदाचार्य , रमाकांत सोबत स्वामी दर्शनाला येतात.
स्वामी त्यांना पाहताच म्हणतात-" काय रे, श्रीकृष्णाला सोडुन एका मनुष्याच्या दर्शनाला कशाला आला ?"
आनंदाचार्य मान खाली घालतात.
स्वामी म्हणतात:" पहा आमच्यात आणी तुमच्या कृष्णात काही साम्य आहे का?"
आनंदाचार्य पाहतात तर काय ? डोक्याला मोर पीस, हातात बासरी असलेला पितांबरधारी कृष्ण समोर उभा आहे .
स्वामी म्हण्झेच श्रीकृष्ण आहे, ही त्यांना खात्री पटते. ते स्वामींचा चरणी लीन होतात.
इकडे रमाकांताला स्वामींच्या जागेवर, धो-धो पावसात अपरात्री येऊन आपल्या पोराला बरे करणारे वैद्य बुवा दिसतात.
त्याला कळते की स्वामी खुद्द वैद्याच्या रुपात आपली मदत करायला आले होते. त्याच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत राहतात.
स्वामी बोध करतात:- " अरे देव एकच असतो पण तो वेग-वेगळ्या रुपात व्यक्त होतो"
"ज्या व्यक्तीला जे रूप पटते त्या रुपाची तो भक्ती करतो"
" आपली इच्छा दुसऱ्यावर लाडू नये, ज्याला ज्या रुपाची भक्ती करायची त्याला ती करू द्यावी."
आनंदाचार्य आपली चूक मान्य करतात.

 

Sunday, August 21, 2011

(७५) चोराचा सज्जन मुलगा

शिवराम नावाचा एक चोर होता,तो आपल्या मुलगा श्रीधरलाही चोर करू पाहत होता.
त्याची बायको नलिनी स्वामी भक्त होती, ती आपल्या मुलाला चांगले संस्कार द्यायची.
या मुळे शिवराम जाम वैतागायचा.एक दिवस रोगग्रस्त होऊन नलीनी देवा घरी जाते.
शिवराम श्रीधरचा बेदम छळ करायला लागतो.
या अत्याचाराला कंटाळुन श्रीधर घर सोडुन पळतो.
एका जागेवर तो रडत बसतो तिथे एका जोडप्याला त्याच्यावर दया येते. तो आपलं कोणी नाही असे सांगतो.
ते त्याला आपल्या शेत आणी घराची राखण करण्याची नोकरी देतात. त्या बद्दल ते त्याला गुरुकुलात पाठवणार होते.
श्रीधर प्रामाणिक पणे आपलं कार्य करत होता पण एक दिवस त्याच्या मालकाचा मित्र येऊन श्रीधर चोराचा मुलगा आहे,
असा खुलासा करतो.
श्रीधर चे मालक काही विचार न करता त्याला घरातून व कामावरून बाहेर काढून टाकतात.
श्रीधर एका ओसाड जागेवर बसून राहतो. त्याचं जागेवर त्याला दोन चोरांचा वार्तालाप कानावर पडतो.
त्याला कळत की चोर त्याच्या मालका कडेच चोरी करणार आहे, तो धावत जाऊन पोलीस शिपायाला खबर देउन आणतो.
चोर पकडले जातात. ते दोघे चोर कोणी दुसरे नसून त्याचे बाबा आणी त्यांचा साथीदार असतात.
श्रीधरचे मालक पुन्हा काहीही  विचार न करता श्रीधरनीच चोरं आणले असं आरोप  करतात.
शिपाई त्यांना सांगतो की श्रीधरच्या सुचने मुळेच चोरं पकडले गेले आहे.
तितक्यात स्वामी येऊन श्रीधरच्या मालकाला समझ देतात.
स्वामी म्हणतात:" अरे पूर्ण पडताळ केल्या शिवाय कोणाच्याही गोष्ठी वर विश्वास ठेऊ नका,किचडात पण कमळ
उगवते हे विसरू नये. माणसाला त्याच्या लायकी प्रमाणे व्यवहार करा, त्याच्या घराण्यां प्रमाणे नाही."
श्रीधर चे मालक आपली चूक मान्य करतात.

Sunday, August 14, 2011

(७४) आत्मोन्नती- हेच शत्रूस सर्वश्रेष्ठ शासन

उद्धव नावाचा एक गायक होता. संगीताच्या एका सामन्यात दशरथ नावाचा दुसरा  गायक त्याचा चौफेर पराभव करतो आणी त्याच्या कडून पुढे कधीही न गाण्याची हमी लिहून घेतो.
जन्मभर उद्धव या अपमानाच्या अग्नीत जळत राहतो, शेवटी त्याचा मृत्यु पण उद्विग्न अवस्थेतच होतो.
मरण्याच्या आधी तो आपला मुलगा अशोक याला हे सर्व वृतांत सांगतो.
जाता-जाता तो अशोकला  अपमानाचा बदला घे अस सांगतो.
अशोक दशरथ चा शोध काढतो. आणी तो अक्कलकोटला असल्या मुळे अशोक ही तिथे येतो.
तो स्वामी दर्शनाला येतो आणी तिथेच मुक्काम करतो.
अशोक, दशरथ चा वध करुन सूड उगवायला पाहतो.
एक दिवस लपून बसून तो दशरथ वर नेम धरुन तो सुरा भिरकावतो पण नेम चुकतो.
अशेच काही प्रयत्न फेटाळले जातात. एक दिवस अशोकला उपरती होते की आपण हे जे करतो ते बरोबर नाही.
पण वडिलांनी म्हटलेला बदला कसा घ्यायचा?
तो एक दिवस स्वामींना मनातलं कोडं विचारतो.
स्वामी म्हणतात: " अरे बदला विधायक असावा. कुणालाही खाली पाडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण वर कस जाऊ हा विचार करायचा असतो."
मग काय अशोक ठरवतो की दशरथ पेक्षा चांगल गायन करुन आपण बदला घेऊ.
अशोकची गायनात कधीही रुची नव्हती. पण आपल्या वडिलांना बरं वाटावे म्हणुन तो त्यांना गायन ऐकवत होता.
पण आता तो पूर्ण-जोमानी गायन शिकायला लागतो.
सुहासिक फुलं जेवढं उमलतं तेवढ जास्त त्याचा सुवास दूर-दुर पर्यंत जातो.
गावात सर्व दुर अशोकच्या गायनाची तारीफ होते.
हे ऐकुन गर्वीष्ठ दशरथची उत्सुकता वाढते.
एकदा स्वामींच्या समोर अशोक गायन करत असतांना दशरथ येऊन ऐकतो.
अशोकच गायन ऐकुन तो भाव-विभोर होतो. त्याला कळतं की आपलं गायन अशोक च्या गायना पुढे काहीच नाही.
तो मुक्त-कंठानी अशोकची तारीफ करतो.
अशोक सर्व प्रकरण सांगतो.
स्वामी म्हणतात: "अरे दशरथ 'बहुरत्ना वसुंधरा' या गोष्ठीला विसरू नको.
अर्थ हा की, या धरती वर अनेक रत्न आहे म्हणुन कोणीही आपल्या कर्तुत्ववान पणाचा किंवा यशाचा अभिमान धरू नये.
स्वामी, दशरथला त्याची चूक पटवून देतात. दशरथ पुन्हा कधीही असे वर्तन न करण्याची हमी देतो.
अशोकचा बदला पण विधायकपणानी सिद्ध होतो.

Monday, August 8, 2011

(७३) प्रारब्ध कुणालाही चुकलेले नाही

सुमन नावाची एक स्वामीभक्त स्त्री, गरोदर असतांना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्या विष्णू बरोबर येते.
स्वामी म्हणतात:-"तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करायची तैयारी ठेव."
सुमनला स्वामी-वचन खरं होणार ही खात्री होती, पण "तैयारी ठेव" या ताकीदीनी तिचा थरकंप सुटतो.
ती या गोष्टी मुळे फार चिंतेत राहायची.
सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी-दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोतं देतात.
शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणुन घेतो.
सुमन एकदा विहिरीतून पाणी आणतांना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते.
वैद्यबुवा गर्भस्थ शिशुचं निधन झालं आहे, अस निदान करतात आणी सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात.
हे ऐकुन सुमन फार खचून जाते.
इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्यानी पीक खराब होते.
शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात. त्याच्यावर देशोधडी वर जायची वेळ येते.
इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते पण अंतर्यामी स्वामी बालळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात.
स्वामी आणी बाळप्पा मध्ये संवाद होतो-
स्वामी: "बाळ्या! अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्मानी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते."
बाळप्पा: "स्वामी यावर काही उपाय नाही का?"
स्वामी: "अरे एकदा पापाचे विपरीत-प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू त्या भोगाला
मागे-पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात."
"अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व देतो. मनुष्याच्या हातून कळत-नकळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहतात आणी
त्याचं परिवर्तन विपरीत-प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते."
"लोग कहते है की भगवान के यहा न्याय मे  देर है, अरे भगवान सबको समय देता है अपने पापं नष्ट करने का."
"कंस, रावण, हिरण्यकश्यप सबको दिया, फिर भी वो नाही माने, तब उनका संहार किया."
बाळप्पा: "स्वामी मग अश्या विपरीत प्रारब्धात मनुष्यांनी काय करावे?"
स्वामी: "अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटतं तेव्हा मनुष्य काय करतो, आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो."
"पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराची कास सोडतो, म्हणतो - "मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले?" .
"बाळ्या पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आता पर्यंत केली, ती जर केली नसती तर आणखी भयाण संकट आले असते."
तिकडे शेत व्हायाल्यामुळे शिवा पण खचलेला असतो.त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते.
पण मग त्याच्या मनात विचार येतो, की स्वामीनी धान्याचे खाली पोते देउन आपल्याला एक खुण केली होती.
तो खंबीर होऊन उठतो, आणी आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो.
स्वामी त्याला सांगतात की जसा तु खंबीर होऊन सावरला तसाच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे.तिला जाऊन काही बोध कर.
पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते, आणी वेडेपणाच्या भरात ती  गळफास लावायला जाते.
पण योगा-योगानी शिवा आणी विष्णू तिथे येऊन तिला अडवतात.
तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात:-" सुमन! मरण सोपं नसतं . आणी मरण जीवाच्या हाती नसतं. अरे जर देवानी ठरवलेली वेळ नसली तर
काहीही केलं तरी सुटका होणार नाही."
"मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार."
"अरे आपल्या सासू,नवरा आणी भावाचा विचार कर. तुझ्या या पाऊला मुळे त्यांना काय वाटले असते?"
सुमन म्हणते:" स्वामी,संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू?"
तितक्यात शारदा(शिवाची बायको) आपल्या नणंदेला आपलं बाळ देते.
शारदा: " हे माझं बाळ घे! याला तु आपल्या मुला सारखे वाढव. याची तुला जास्त गरज आहे."
"मला काय, मला दुसरं अपत्य होईल."
स्वामीवचना प्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते. सुमन सावरते आणी आनंदानी पुढच्या आयुष्याची सुरुवात करते.

Sunday, July 31, 2011

(७२) सत्याची कास

शरद आणी संतोष दोन भाऊ होते, त्यांचा परिवार अगदी गडगंज श्रीमंत होता,
पण स्वभावानी दोन्ही भाऊ अगदी वेग-वेगळ्या टोकावर
होते. शरद गर्विष्ठ, दुष्ट आणी गोर-गरीबांना छलणारा होता. संतोष त्याउलट अडलेल्या-नडलेल्यांना मदत करणारा होता.
त्यांच्या कडे गृह कामात मदत करायला कोमल नावाची एक स्त्री-गडी होती.
संतोष चा स्वभाव मन-मीळाउ असल्यानी कोमल चा भाऊ
मकरंद ,संतोष चा चांगला मित्र होता.
संतोष स्वामींकडे आल्या असतांना, स्वामी संतोष ला गीता देतात. स्वामी प्रसाद म्हणुन संतोष ग्रंथाला घरी आणतो,
पण स्वामींनी गीता आपल्याला का दिली, यावर तो फारसा विचार  करत नाही.
एक दिवशी शरद एकांत साधून कोमलला वाईट हेतूंनी धरतो.
कोमल जेव्हा फार प्रयत्न पण करुन स्वताला सोडवू शकत नाही,तेव्हा
ती  शरद च्या हाताला कड-कडीत चावा घेऊन आपली सुटका करते.
शरदच्या दरारा आणी घरच्या अन्य लोकांच्या प्रेमामुळे ती कुणालाही काहीही सांगत नाही.
पण कामांध शरद तर नवीन संधीच्या शोधात होता.
एक-दिवस घरी कोणी नसतांना तो पुन्हा कोमल वर दुराचार करायला जातो. पण योगा-योगानी संतोष तिथे येऊन
कोमल ला सोडवतो.
पण या वेळेला कोमल घरच्यांना सर्व सांगते. मकरंद पंचायत मध्ये तक्रार नोंदवतो. साक्षीदार म्हणून संतोष चा नाव देण्यात येतं.
पण संतोष धर्म संकटात पडतो,एका पक्षात त्याचा मोठा भाऊ आणी दुसऱ्या पक्षाला त्याचा जिवलग मित्र.
संतोष स्वामींचं मार्गदर्शन मागतो.
स्वामी म्हणता-" सत्याची कास धर, न्यायाच्या पक्षांनी साक्ष दे."
संतोष कोमल ला न्याय मिळवून द्यायला साक्षी साठी तैयार होतो.
चाणाक्ष शरद, आपल्या बायको ला संतोष समोर गया-वया करुन त्याला खरी साक्ष देण्यापासुन परावृत्त करायला पाठवतो.
संतोष पुन्हा गोंधळतो.
पंचायत भरते. शरद वर आरोप मांडला जातो. पंच संतोष ची उलट-तपासणी करतात.
पण शरद गप्प राहतो.
तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात.
स्वामी म्हणतात:-"शरदा! काय आप्त-जनासाठी सत्यापासुन पाठ फिरवली? अरे आम्ही तुला गीता कशाला दिली होती?"
"अरे फक्त अर्जुनासाठीच नाही तर जगातल्या सर्व दुविधेत असलेल्या लोकांना मार्ग दर्शनासाठी कृष्णानी गीता सांगितली होती."
"गीता नुसती पाठ करण्या साठी नसून आचरणात आणण्या साठी आहे."
"अरे आप्त-जनासाठी आपलं कर्तव्य आणी सत्याची कास सोडू नको."
"आत्ता पर्यंत अगणित-जन्मात अगणित-आप्तजन तुला प्राप्त झाले आहे,आणी त्या मायेतच वावरत राह्यला तर मोक्ष कधीही
प्राप्त होणार नाही."
स्वामींच्या बोधामुळे संतोष खरी साक्ष देतो आणी त्यावरून शरद ला शिक्षा होते.
मकरंद म्हणतो- "शरद ला शिक्षा झाली पण माझ्या निष्पाप बहिणीचं काय तिला काहीही न करता अपमानाचा ठपका
लागला, आता तीचाशी कोण लग्न करणार?"
स्वामी कोमल चा हात संतोष च्या हातात देतात.
कोमल आणी संतोष एकमेकासाठी अनुरूपच होते,म्हणुन सर्व लोकं फार खुश होतात.
पंच विचारतात:-"स्वामी आपल्याला तर सर्व माहित होतं, मग आपणच शरद ला शिक्षा का नाही केली?"
स्वामी म्हणतात:-" आम्ही जर ते केले असते तर कर्तव्याच्या कसोटी वर संतोषची परीक्षा झाली नसती?"
"आपले कर्तव्य पूर्ण केल्या शिवाय, सत्याची कास न धरता त्याला मोक्ष मिळाला नसता."
"आपलं कर्तव्य चोख पारपाडल्या मुळे संतोषची मोक्षाची वाट-चाल आता मोकळी झाली आहे."
संतोष गहिवरून स्वामींचे पाय धरतो.

Sunday, July 24, 2011

(71) दानात अहंकार नसावा

गोपाळ शेट नावाचा एक व्यक्ती दानशूर होता. तो गोर-गरीबांना फार मदत करायचा पण आपलं नाव-लोकिक व्हावे ह्या इच्छेनी .
लोकांच्या तोंडातून आपला उदो-उदो ऐकायला त्याला फार आवडायचं.
एकदा स्वामींच्या मनात त्याचा गर्व दुर करायचा विचार येतो, स्वामी चोळप्पाला घेऊन गोपाळशेट च्या गावाला निघतात.
रस्त्यात त्यांना एक व्यक्ती जीव द्यायला जाताना दिसतो.
स्वामी त्याला अडवतात तेव्हा तो आपले दुःख सांगतो.
तो व्यक्ती पत्नी-वियोगानी फार दुखी होता.
सर्वांचा सुखी संसार आहे पण आपला नाही, या भावनेनी तो सदैव व्याकुळ असायचा.
आणी त्या त्रासाला गांजून तो मृत्यु पत्करायला जात होता.
स्वामी त्याला बरोबर घेऊन पुढे प्रवास करतात.
पुढे कर्जापाई सावकाराच्या जाचणी मुळे गांजलेला व्यक्ती जीव देताना सापडतो.
स्वामी त्यालाही बरोबर घेऊन पुढे प्रवास करतात.
त्या दोघांना घेऊन ते गोपाळ शेट च्या घरी येतात.
स्वामी म्हणतात: "गोपाळ शेट तुमचं दानशूर असं नाव-लोकिक  ऐकुन आम्ही तुमच्या कडे या लोकांना घेऊन आलो आहे."
"आम्हाला आशा आहे तुम्ही यांच्या दुखाला दुर करणार."
कर्जानी वैतागलेला व्यक्तीला गोपाळ शेट धनाचीमोठी पोटली देतात.
पत्नी वियोगानी गांजलेल्या व्यक्तीला लग्नासाठी त्याच्या योग्य अशी नवरी पण गोपाळ शेट गाठून देतात,
त्याशिवाय धनाची एक छोटी पोटली पण देतात.
दोन्ही व्यक्तींच्या आनंदाचा पार राहत नाही.
मग गोपाळशेट स्वामींना विचारतात की त्यांना काय अपेक्षा आहे.
स्वामी अगदी फटकळ उत्तर देतात- "आम्हाला जे पाहिजे ते वर बसलेला आमचा बाप देतो."
"आणी जर त्याची इच्छा नसेल तर जगात कोणीही काहीही दिले तरी काहीही फायदा होणार नाही."
गोपाळशेट ला अनावर राग येतो पण तो दात-ओठ चावुन राहतो.
सर्व लोकं गोपाळ शेट कडून परततात.
रस्त्यात त्यातला एक व्यक्ती चोळप्पाला आपली धनाची पोटली सांभाळायला देतो, पण चोळप्पाच्या हाती आधीच एक पोटली
असल्यानी स्वामी खुद्द पोटली हातात घेऊन चालतात.
इकडे गोपाळ शेट आपल्या माणसाला सांगतो की ज्या व्यक्तीच्या हातात काही पोटली नाही त्याला धरुन आण.
गोपाळशेट ला स्वामींना धडा शिकवायचा होता,
म्हणे खूब देव-देव करतो जेव्हा अन्न-पाण्या शिवाय तळघरात डांबून ठेवणार तेव्हा बुद्धी ताळ्यावर येईल.
शेट चा माणूस जेव्हा येतो तेव्हा स्वामींच्या हाती धनाची पोटली असल्यानी त्यांना धरत नाही
आणी उलट ज्याची ती पोटली होती त्याच्या कडे काही नसल्यानी
त्यालाच धरुन आणतो.
गोपाळशेट ला पाहिजे तो व्यक्ती नसल्यानी राग येतो.
गोपाळ शेट त्या माणसाला डांबून ठेवतात आन्ही पुन्हा आपल्या माणसाला तीच
कामगिरी करायला पाठवतात.
योगा-योगानी पत्नी- वियोगानी दुखी झालेला माणूस लघु-शंकेला जायचं म्हणुन आपल्या हातातली पोटली स्वामींना देउन जायला निघतो.
तितक्यात गोपाळ शेट चा माणूस येऊन त्याला धरुन नेतो.
या वेळेला पण गोपाळ शेट चा बेत फसतो.
गोपाळ शेट बारकाईनी  विचार करतो की ज्या माणसांनी आपल्या कडून काहीही घेतले नाही त्यांना आपण पकडू शकलो नाही
आणी उलट ज्यांना पकाडायचे नव्हते ते पकडले गेले.
गोपाळ शेटला "हरी इच्छा बलीअसी" चा सुक्तीचा खरा अर्थ काय तो कळतो.
गोपाळ शेट स्वामींच्या शरणी येतो.
चोळप्पाला काय चालले आहे तेच कळत नाही.
स्वामी म्हणतात: "अरे व्यक्ती कितीही समर्थ असला तरी ज्याच्यावर ईश्वराची सावली असते त्याचे काहीही
वाईट करू शकत नाही. ही गोष्ठ गोपाळ शेटला आता कळली आहे."
"त्या दोन व्यक्तींच्या जीवनात आतापर्यंत जे घडले ते त्यांच्या कर्मा मुळे प्राप्त झालेल्या प्रारब्धा मुळे झाले."
गोपाळशेट प्रांजळ पणे हात जोडून उभा असतांना स्वामी म्हणतात:" अरे त्या निर्दोष लोकांना सोड!"
गोपाळ शेट मान्य करतो.
"लक्ष्यात घे, दान करणे चांगले आहे, पण दानाचा अहंकार नसावा."
"एका हातानी केलेले दान दुसऱ्या हाताला ही कळायला नको"
"दान करुन नाव-लोकिकाची अपेक्षा करणे हे दान नसुन व्यापार झाला."
गोपाळ शेटला चूक पटून तो पुढे नाव-लोकीकाची अपेक्षा न करायचं ठरवतो.

Sunday, July 17, 2011

माणसाची पारख

नरेंद्र महाराजांना एक अंगरक्षक पाहिजे होता पण पाहिजे तसा मिळत नव्हता.
त्यांच्या राज्यात एक वीर नावाचा व्यक्ती होता. नावा सारखाच तो खरा वीर होता पण दारिद्रानी गांजला होता.
या साठी तो नरेंद्र राजा कडे नौकरी मागायला जातो. रस्त्यात एक गुंड एक माणसाला लुटत होता,वीर प्राणांवर खेळून
त्या माणसाला वाचवतो.
राजाचे मुनीम हे पाहून त्याला राज्या कडे घेऊन येतात.
राज्याच्या अंगाराक्षकाचे काम करायला वीर तैयार होतो पण दिवसाला ५०० मोहोरा मागतो, एवढी जास्त रक्कम ऐकुन राजा
विचार करू असं म्हणुन त्याला परतावतो.
स्वामींशी भेट होता ते राजाला म्हणतात कि काही दिवस वीर ला ठेऊन परीक्षा पहा, उतीर्ण झालं तर नियुक्त करा, आम्ही स्वत:
परीक्षेत तुझी मदत करू.
वीरची नियुक्ती होते,तो आपलं काम योग्य पणे करतो.
एक दिवस राजाला एक स्त्री चे रुदन ऐकू येते. तो वीर ला कोण रडते आहे, हा तपास करायला सांगतो.
वीर शोध घेतो, ते त्याला एक सुंदर व कुलीन स्त्री रडतांना दिसते.
विचारल्यावर ती सांगते कि मी राज्याची राजलक्ष्मी आहे.पण आता राजाला सोडुन जाणार आहे.
आता राजा दरिद्री होणार.मागोमाग राजा येऊन गवाक्षातून हे एकत असतो.
वीर उपाय विचारतो.
राजलक्ष्मी म्हणते कि तुझ्या ३२ शुभ लक्षणानी युक्त मुलाची बळी दिली तर मी इथे थांबीन.
वीर घरी जाऊन संकल्प सोडुन विष पाजून आपल्या मुलाचा बळी देतो.
निपुत्रिक होऊन कसे जगायचे म्हणुन तो स्वत: ही विष पिऊन जीव देतो.
पती आणी पुत्र गेल्यावर त्याची पत्नी पण विष पिऊन प्राण त्यागते.
राजा पर्यंत गोष्ट येते, आपण राजा असून प्रजेचे रक्षण करू शकलो नाही याचा त्याला खंत वाटतो.
तो स्वताच्या तलवारींनी आपलीच मुंडकी छाटायला जातो पण तलवार मानेच्या एक बोटं पर्यंत येऊनच थांबते.
तितक्यात स्वामी प्रगट होतात.
स्वामी म्हणतात:" राजा तु कनवाळू आहे, आपल्या मुळे प्रजेचा जीव गेला याची तुला खंत वाटून तु प्राण द्यायला गेला.
राजा असाच असावा.आम्ही तुझ्या वर प्रसन्न आहो."
राजा स्वामींकडे वीर च्या परिवाराचे जीवन मागतो. स्वमिकृपेनी वीर परिवारा सकट जिवंत होतो.
मग स्वामी राजलक्ष्मी चे रूप दाखवून त्यांना जाणीव करुन देतात कि ही त्यांचीच रचना होती.
वीर आणी नरेंद्र राजा दोन्ही परीक्षेत उतीर्ण होतात.
स्वामी नरेंद्र राजाला म्हणतात: "उत्तम माणसांना ओळखा आणी त्यांना जपा."
"वस्तू उत्तम असली तर किम्मत ही उत्तम मोजावी लाजते."

Monday, July 11, 2011

मोहाचे पाश

बापट नावाचा एक व्यक्ती स्वामीभक्त होता.स्वामींच्या दर्शनासाठी आलेले लोकांची राहायची सोय तो करायचा,जे प्रेमानी मिळायचे ते स्वीकारायचा.
त्याची उपजीविका नाक्यावर जकात वसूल करायची होती.पण हळू-हळू त्याला लाच खाऊन लोकांना कमी कर घेऊन सोडायची वृत्ती होते.
काही दिवसांनी त्याच्या मुलाला दम्याची बाधा होते,दिवस प्रती-दिवस रोग वाढत जातो.
एक दिवस त्याच्या बोलवण्याला हुसकावून वैद्य दुसऱ्या गावी पाटीलाच्या मुलाला पाह्यला जातात.
बापट विचार करतो की आपण श्रीमंत नाही म्हणुन आपल्या कडे न येता वैद्यबुवा पाटला कडे गेले.
मग तो श्रीमंत व्हायला काहीही करायचे ठरवतो.
भयंकर लाच खायला लागतो. स्वामी दर्शनाला आलेले जे लोकं त्याच्याकडे मुक्काम करायचे त्या लोकांना अपमानित करुन भयंकर पैशे उकळतो.
काहीही करू पण श्रीमंत होऊ आणी चांगल्यात चांगला वैद्य आणून आपल्या शरदचा आजार बरा करू.
एक-दोन दा अटक व्हायची पण वेळ येते पण शिपायाला लाच देउन तो सुटतो.
आजार बरा होत नाही, म्हणुन तो स्वामींकडे सांकडं घालायला जातो.
स्वामी त्याला वाल्या-कोळ्याची गोष्ठ सांगतात.
त्या गोष्टीचा बोध असा -"आपले पापांचे आपणच जवाबदार असतो, पत्नी आणी मुलांना पाप करुन प्राप्त धनानि कितीही सुख दिले तरी ते पापाचे वाटेकरू
नसतात. म्हणुन माणसांनी नितीपूर्वक सचोटीने वागावे.घरच्यांना सुख देण्या साठी अडलेल्या-नडलेल्या लोकांचा छळ करू नये."
पण बापटवर काही परिणाम न होता तो परततो.
स्वामींनी काही आश्वासन न दिल्या बद्दल तो नाखुश असतो.
एकदा त्याचे चार मित्र येतात. ते आप-आपल्या परिवाराची सर्व व्यवस्था लाऊन, 'वैराग्य पत्करून स्वामी चरणात शेवटचे आयुष्य काढू',असा विचार करुन येतात.
त्यांचा मुक्काम बापट कडेच असतो. त्यांच्या समोर पुन्हा बापट ला अटक व्हायची वेळ येते पण त्या मित्र पैकी एकाची मोठ्या अधिकार्याशी मैत्री असल्या मुळे बापट पुन्हा सुटतो.
पण बापट आपलं वर्तन सुधारत नाही.
ते चारी जण स्वामींकडे येऊन आपला मनोगत सांगतात. स्वामी चोळप्पाला सांगून त्यांची राहण्याची व्यवस्था करवतात.
बापटला पुन्हा अटक होते पण या वेळेला तो काहीही करुन सुटत नाही.
इकडे शरदचा रोग फार वाढतो. बापटची बायको मनात स्वामींची करुणा भाकते.
स्वामी चोळप्पा च्या हाती औषध पाठवतात.ते औषध खाऊन शरद अगदी खड-खडीत बरा होतो.
एका रात्री चारी मित्र झोपले असतांना, रात्री चोर त्यांच सामान चोरी करता..
ते सर्व विलाप करतात आणी दुसऱ्या दिवशी स्वामी कडे घाराणं घालतात.
स्वामी म्हणतात: " छान झालं ! सुंठेवाचून खोकला गेला!"
"अरे तुम्ही सर्वस्व त्याग करुन वैराग्य पत्करायला आले ना? मग जरासे ऐवज गेले तर का विलाप करतात?"
"अरे वैराग्य सोपे नाही, आधी ते मनात आले पाहिजे. मनात वैराग्य नसले आणी जर घर-दार सोडून वनात जाणार तर वनात दुसरे घर तयार होईल."
"आधी मनातून मोह,चिंता,लालसा हे सर्व शत्रू काढा, तेव्हा खंर वैराग्य येईल."
बापट ची बायको शरद ला घेऊन स्वामी कडे आभार व्यक्त करायला येते.अटक झालेला बापट सुद्धा शिपायाची गया-वया करुन येतो.
स्वामी म्हणतात:" अरे बापटा ! शरद तुझ्या वाईट कर्मांच्या फळा मुळेच आजारी पडला होता.
"आणी ते वाईट कर्म गुरु-भक्ती किंवा नामस्मरण करुन नष्ट करायचे सोडुन तु आणखी वाईट कर्मांचा भर घालत होता,"
"म्हणूनच शरद चा आजार वाढत जात होता."
"अरे पानं-पाचोळ्याला लागलेला विस्तव अजून पानं घालुन कसा शांत होणार, आणी तु नामस्मरणाचे पाणी घालायच्या जागी आणखी पानं घालुन
तो विस्तव वाढवत होता."
"आम्ही तुला वाळ्याची गोष्ठ सांगितली तरीही तुला काहीही बोध झालं नाही."
"अरे वाळ्यानी अफाट पाप केले पण त्याच्या तोडीचे नामस्मरण करुन ते नष्ट केले."
"पाप करतांना सहज होत गेले पण त्यांचा विमोड करतान त्याला कठोर तपस्या करावी लागली."
"आणी तपस्या पण साधी नाही, जेवढा वेळ पाप करण्यात गेला त्याच्या अनेक-पट वेळापर्यंत त्याला तपस्या करावी लागली."
"एवढा एकनिष्ठ झाला कि शरीरावर मुंग्यांनी वारूळ केले तरी त्याला कळले नाही."
बापटला आपली चूक कळते, तो पुन्हा पहिल्या सारखा सचोटीनी आणी निष्ठेनी वागण्याचं ठरवतो."

Sunday, July 3, 2011

(६८) पेढ्यांची सांखळी

माधव आणी मंगेश  सक्खे भाऊ होते. मंगेश हा धाकटा होता. दोघेही स्वामी भक्त होते.
त्यांच्या घरी दत्ताच्या पादुका होत्या आणी दोन्ही भाऊ अगदी निष्ठेनी त्या पादुकांच पूजन करायचे.
पूजेच्या तैयारीची जवाबदारी दोघांच्या बायकांवर होती.मोठी जाऊ कामचुकार होती आपली जवाबदारी नीट पार पडायची नाही आणी
छोटी तिच्या ठरलेल्या दिवसा शिवाय पूजेची व्यवस्था करायला तैय्यार नसायची.
त्यांच्यात याच्यावरून भांडण होत राहायचे.
दोघी भावांना स्वामी सांगतात:- "अरे घराची व्यवस्था नीट ठेवणं हे पुरुषा पेक्ष्या स्त्रीच्या हाती जास्त असतं."
"पुरुषांनी स्त्रीच्या जास्त आहारी जाऊ नये. जे योग्य आहे तेच करावं."
लहान मुलांच्या भांडणावरून पुन्हा दोन्ही जावांच भांडण होतं. मोठी जाऊ छोटीच्या मुलावर हात उगारते.
मंगेश विरोध करतो आणी त्यावरून दोघा भावात भांडण होतात.
काही दिवसांनी माधवला त्याचा मित्र श्याम स्वामींचा प्रसाद म्हणुन पेढा देतो आणी सांगतो -
 "अशेच २१ जणांना पेढे वाटायचे आणी
ज्याला पेढा मिळाला त्यांनी पण २१ लोकांना पेढे वाटायचे, पेढ्याची सांखळी तुटता कामा नये.
जो असं करेल त्यावर स्वामी कृपा करतील आणी
जो नाही करणार त्याच्यावर स्वामींचा कोप होईल"
.माधव पेढे वाटतो.

मुळात दोघा भावात आपसात फार प्रेम असतं या मुळे दोघांनाही या गोष्ठीची खंत वाटतो.ते दोघे एक-मेकाची
क्षमा मागून समेट करतात. मंगेश ला एकविसावा पेढा देउन माधव त्याला साखळी कायम ठेव अस सांगतो.
पण मंगेश खऱ्या अर्थानी स्वामी भक्त होता तो अश्या अंध-विश्वासांना मानत नव्हता.
पेढे नाही वाटले तर स्वामी कोपतील, ही एक भ्रामक कल्पना आहे असं म्हणुन तो आपल्या मोठ्या भावाला सांगतो पण माधवला
पटत नाही.
पुन्हा एकदा बायकांच्या भांडणावरून दोघा भावात विवाद होतो.
पुन्हा समेट करतांना माधव मंगेश ला सांगतो कि तु पेढ्याची सांखळी मोडली म्हणून आपल्यात भांडण झालं
तरीही मंगेश चा विश्वास बसत नाही.
एकदा तर हद्दच होते. छोट्या जाऊबाईनी केलेल्या पापडा वर मोठी जाऊ घेरी आल्याच निमित्त करुन पाण्याचा घडा पाडते.
सर्व पापड खराब होतात.या वेळेला भांडण फार उग्र होउन शेवटी दोघा भावांची वेगळं व्हायची वेळ येते.
मंगेश वेगळा जायला निघतो पण दत्त-पादुका बरोबर न्यायला जातो ,माधव सांगतो कि पादुका मोठ्या भावा कडेच राहणार.
मंगेश ऐकत नाही आणी पादुका उचलायला जातो, यावरून माधव त्याला बेदम मारून हकलून देतो.
मंगेश स्वामींकडे जाऊन आपलं घाराणं सांगतो.
मग मंगेश एक क्रूर वाक्य म्हणतो कि जर माधव आणी त्याचा मुलगा मेले तर पादुका आपल्याला मिळतील.
स्वामी थोडसं रागवून त्याला साम्झावतात- "अरे काय पादुका-पादुका करत आहे? अरे देव काय फक्त पादुकात असतो का?"
"अरे जली,स्थळी,काष्ठी पाषाणी व सर्व जीवात  देव असतो."
"देव सर्वत्र व्याप्त आहे- देव नाही असं कोणचच ठिकाण नाही."
"अरे देवाची निर्गुण उपासना कर,पादुका तर उपासना करण्यात सहायता करतात पण पादुका नसल्या तर उपासनाच करता येत नाही
असं मानणं चुकीचं आहे.त्या पादुकांसाठी आपल्या भावा आणी पुतण्याची मृत्यु इच्छितो, काही वाटतं कि नाही तुला?"
मंगेश मान खाली घालुन परततो.
इकडे  चोळप्पा स्वामींनी काहीही सांगितलेलं कार्य स्वता न करता राघवच्या हाती करवून घेत होता.
एका शिष्यांनी विचारल्यावर स्वामी सांगतात कि  चोळप्पा हा पूर्व आयुष्यात गडगंज श्रीमंत  असल्यानी त्याच्यात ही वृत्ती आहे पण
त्याच्या आध्यात्मिक प्रगतीत बाधक ही गोष्ठ आम्ही दुर करू.
एकदा असच स्वामींनी दिलेलं कार्य चोळप्पा राघव ला सांगतो.
स्वामी रागावतात:- "अरे चोळ्या स्वता होऊन आमची सेवा करण्याच तु पत्करलं आहे ना? मग आम्ही दिलेले कार्य
करायला तुला पड-सेवेकरी कशाला पाहिजे?"
" 'अरे शिष्याला "दीर्घदण्डं नमस्कृत्य निर्लज्जो गुरुसन्निधौ' या वृत्तींनी गुरु कडे वावरलं पाहिजे."
(जगाची परवा न करता निर्लज्य होऊन शिष्यांनी गुरुला दंडवत नमस्कार केलं पाहिजे)
"अरे हे कार्य आमी तुमचा अहं भाव जायला करवतो,जो तुमच्या आध्यात्मिक प्रगतीत बाधक आहे."
"वरना हमे किसी से कोई काम करवाने की  जरुरत नही है."
चोळप्पा चूक मान्य करतात.
तिकडे घरी जाऊन मंगेशला कडकडून ताप येतो. काहीही केल्या ताप उतरत नाही. मंगेश ला वाटतं कि पेढ्यांची साखळी
मोडल्या मुळे हे सर्व झालं असावं.
 घरी पूजा करत असतांना माधव चा एक हात निकामी होतो.
दुसऱ्या दिवशी आप-आपल्या रोगापासून हैराण होऊन दोघे भाऊ स्वामींकडे येतात.
मंगेश म्हणतो-" स्वामी पेढ्यांची सांखळी तुटल्या मुळे माझ्यावर त्रासांचा मारा होत आहे".
माधव पण आपल्या समस्येसाठी सांखळी तुटायला कारणीभूत ठरवतो.
स्वामी जाम भडकतात:-" महा मूर्खांनो ! सांखळी तुटल्यानी काही झालं नाही. तुम्ही सर्व आपल्या कर्मामुळे दुखी झाला आहे."
"मंगेश तु पादुकांसाठी आपल्या भाउ आणी पुतण्याची मृत्यु इच्छिली."
"आणी माधव तु आपल्या पातळयंत्री आणी कामचुकार बायकोच्या सांगण्यात येऊन आपल्या भावाशी भांडण केले,
त्याला बेदम मारलं."
"अरे सांखळीचा आध्यात्मिक दशहतवाद कौन पसरवतो याचा विचार का नाही केला?
"पेढे खपल्या मुळे कुणाला फायदा होणार एवढी छोटीशी गोष्ठ तुम्ही सर्वांच्या लक्ष्यात कशी नाही आली?"
दोन्ही भाऊ आपली चूक मान्य करतात.
स्वामी म्हणतात:-"माधवा,आपल्या छोट्या भावाला प्रेमानी कुशीत घे."
माधव म्हणतो :"-स्वामी पण माझा हात निकामी झाला आहे."
स्वामींच्या कृपादृष्टीनी माधव चा हात बरा होतो, तो मंगेशला कुशीत घेतो,
आणी चटकन ओरडतो-"अरे मंगेश तुझा ताप पूर्णपणे उतरला आहे."
स्वामी कृपेनी दोघे भाऊ पूर्णपणे निरोगी होतात.
आता मागे झालेल्या चुकांना विसरून ते पुन्हा गुणा-गोविंदांनी एकत्र रहाण्याचं ठरवतात.


Sunday, June 26, 2011

स्वामी हाच आधार

महारुद्रराव एक श्रीमंत  व्यक्ती होता. त्याची मुलगी राधा उपवर झाली असून तिचं लग्न जमत नव्हते.
श्रीमन्ताची मुलगी आपल्या कडे सुखानी  नांदणार नाही, असं म्हणुन गरीब लोकं मागणी घालत नव्हते.
श्रीमंत स्थळ यायचे  पण अफाट हुंडा मागायचे, जे महारुद्ररावांच्या तत्वा विरुद्द्ध होतं.
शेवटी ते स्वामींचं स्मरण करुन पुन्हा स्थळासाठी प्रयत्न सुरु करायचा निश्चय करतात.
स्वामी कृपेनी काही दिवसांनी घर बसल्या सर्वप्रकारे योग्य असं स्थळ येऊन राधेच लग्न जमतं.
महारुद्ररावांच्या आनंदाचा पार नाही राहत, ते स्वामींच्या मठात सहस्त्र भोजन घालायचं ठरवतात.
सर्व स्वामींकडे येतात.
भेटल्या बरोबर स्वामी महारुद्राला म्हणतात :" सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा  करू नका."
आनंदाच्या भरात महारुद्रराव, स्वामी वचनाला फारसे महत्व देत नाही.
मग काय सहस्त्र भोजन होतं, सर्व लोकं जेवण करुन झोपतात.
अर्ध्या रात्री स्वामी ओरडतात:-"अरे झोपला काय आहे! चोर येऊन सर्व लुटून गेले आहे."
महारुद्रराव पाहतात तर त्यांचं सर्व सामान चोरी गेलं होतं. राधेच्या लग्नासाठी केलेले सर्व दागिने पण त्यात होते.
महारुद्रराव स्वामींना वैतागून म्हणतात:-"स्वामी चोर आले तेव्हाच का नाही हो सांगितलं?"
स्वामी म्हणतात:-"अरे आम्ही काय पहारेकरी आहो का? आम्ही पहिलेच सांगितले होते, सावध राहा पण तुम्ही
गाफील राहिला."
महारुद्ररावला आपली चूक कळते तो स्वामींची करुणा भाकतो.
स्वामी म्हणतात:- "५ चोर होते. शोध त्यांना "
कोण ते विचारल्यावर स्वामी म्हणतात कि आमच्या पोरांना विचारा.
महारुद्रराव विचार करतात कि स्वामींचे पोरं कोण?
चोळप्पा विचार करतात कि शरीरातले चोर म्हणजे चित्त आणी मन ,पण त्यांचा बंदोबस्त करायला विवेक पाहिजे,
 स्वामी ज्यांना विवेकाची प्रतीमुर्ती म्हणतात ते फसलगावचे भगवान देशपांडे, हेच स्वामींचे पुत्र असावे.
महारुद्रराव आणी चोळप्पा त्यांच्या कडे जातात.
देशपांडे मदत करायला तय्यार पण होतात पण म्हणतात कि हे काम मी एकटा नाही करू शकत.
मला कुणाची मदत पाहिजे.
चोळप्पा म्हणतात कि आपल्याला आता स्वामींच्या दुसऱ्या पोराला शोधले पाहिजे.
पण तो दुसरा पोरगा कोण असावा?
तितक्यात रस्त्यात  जाताना दोन व्यक्ती बोलत असतात.
एक व्यक्ती दुसऱ्याला एका कहाणीचा बोध सांगत असतो- " अरे विवेकाला बुद्द्धी ची जोड लागते."
चोळप्पा सर्वाना म्हणतात आता  बुद्धियुक्त  कोण व्यक्ती स्वामींचा पोर असावा?
तितक्यात देशपांडे म्हणतात- "माझा एक मित्र आहे, गावाचा पाटील आहे बुद्धी आणी शक्तीनी युक्त आहे आणी तो अनन्य स्वामी भक्त आहे."
सर्व जण पाटील यांच्या घरी जातात. पाटीलांना जेव्हा कळतं कि पाच चोर होते , तेव्हा  ते सर्वांना घेऊन चोरांच्या एका
ठिकाणाची झडती घेतात.
पण तिथे फक्त दोन व्यक्ती सापडतात.
त्यांच्या बरोबर असलेला जमादार जेव्हा त्यांना दम देतो तेव्हा चोरं त्यांना सांगतात कि बाकीचे तीन बाहेर गेलेले आहे.
चोरांना शिक्षेत कमीचं लालूच देउन पाटील त्यांना बाकीच्या तिघांना पकडण्या करता मदत मागतात.
दोघे चोर हमी देतात. मग काय ठरवलेल्या जागेवर ३ चोर आपल्या  साथींना भेटायला येतात आणी पकडले जातात.
महारुद्रराव यांना राधेसाठी केलेले दागिने मिळतात.
ते स्वामींकडे येऊन म्हणतात:-"सर्व लोकं आम्हाला विचारायचे कि आम्ही स्वामी भक्ती का करतो?"
कारण त्यांच्या मते सर्व सुख असणाऱ्या व्यक्तीला स्वामी उपासनेची काय गरज असावी."
"तेव्हा मी त्यांना उत्तर देत होतो कि स्वामी भक्तिनी समाधान मिळतं."
"पण आता मला जाणीव झाली कि स्वामी भक्तिनी आधार पण मिळतो."
"काही कार्य करतांना जेव्हा माणसाला विकल्प येतात, मन कामापासून परावृत्त करतं तेव्हा सद्गुरुचं नाव त्याला धीर देतं आणी तो
कार्य करायला तैयार होतो."
"सद्गुरू, हे तत्व माणसाचं भयं नष्ट करुन त्याला कार्य करायला प्रेरीत करतं."
स्वामी स्मित मुद्रेनी म्हणतात: " भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे "


 

Sunday, June 19, 2011

(६६) करावे तसे भरावे

मोरेश्वर नावाचा एक सावकार होता. तो वृत्तींनी अत्यंत अप्रामाणिक होता.कोणीही जर जागा गहाण ठेवायला आला तर त्याला तो
कर्ज न फेडता आल्यास जागा जब्त होईल, अशी भीती दाखवून त्या ऐवजी जागेचा विक्रय कर असं सुचवायचा.
जागेची किम्मत पण तो चालत्या भावा पेक्षा जास्त द्यायचा पण व्यक्ती जागा विक्रय करुन परतताना आपला पाळलेला वाटमारा
पाठवून ती रक्कम लुटून घ्यायचा.
अश्या प्रकारे, त्यांनी कित्येक लोकांना लुबाडलं होतं.
एकदा एक लुबाडला गेलेला भक्त स्वामींकडे आपलं घाराण मांडतो. स्वामी त्याला सांगतात कि वाटमारा मोरेश्वराचाच माणूस होता,
तु पोलिसात तक्रार नोंदव.
मग काय मोरेश्वराला अटक होते. अधिकारी लांच खाऊन आपल्याला सोडत नाही या साठी मोरेश्वर तुरुंगातून सुटका व्हावी म्हणून
स्वामींना चांदीच्या पादुका अर्पण करायचा नवस सांगतो.
इकडे मोरेश्वरची पत्नी स्वामींकडे घाराणं घालते. स्वामी पहिले तिच्या नवऱ्याचा वागणुकी बद्दल तिची हाजिरी घेतात
मग तिला आश्वस्त करुन पाठवतात.
मोरेश्वरची पुराव्या अभावी सुटका होते.
पण सुटका होताच मोरेश्वर वेगळीच भाषा बोलू लागतो-"
माझी सुटका माझ्या पैश्या मुळेच झाली आहे, स्वामींना केलेला नवस फळला नाही."
बायको त्याला सांगते की मी करुणा भाकली म्हणुन स्वामींनी तुम्हाला सोडवले आहे, तुम्ही नवस फेडा.
मोरेश्वर चांदीच्या पादुका घेऊन स्वामींकडे जातो पण मनात विकल्प येतात.
अत्यंत लोभानी तो पादुकांच्या खुंट्या तोडून खिशात ठेवतो आणी समाधान मानतो की एवढी चांदी तर वाचली.
स्वामींना पादुका अर्पण करण्यात येतात. खुंट्या तुटलेल्या पादुका पाहून स्वामींना राग येतो.
स्वामी: " काय रे मोरेश्वर! आत्ता पर्यंत जगाला फसवत होता, आज आम्हाला फसवण्यापर्यंत तुझी मजल गेली !"
स्वामी रागवून मोरेश्वरला हाकलून देतात पण जाता जाता त्याला म्हणतात की घरी आम्ही तुझ्या साठी एक भेट ठेवली आहे.
घरी जाऊन मोरेश्वरला कळत कि त्याचा मुलगा वामन वाईट मार्गाला लागला आहे, तो मद्यपान करतो,जुगार खेळतो ,
घरातले पैशे पण चोरतो.
मोरेश्च्वर रागावतो तर वामन दुरुत्तर करतो.
मोरेश्वर आणखी काही सांगणार, त्या आधी शिपाई त्याला परत अटक करतो कारण त्याच्या विरुद्ध पुरावे सापडले होते.
मोरेश्वरला अटक होताच वामन सर्व संपत्ती आपल्या नावावर करण्याचा कारभार सुरु करतो.
आपला वाया गेलेला मुलगा आपल्याला देशोधडीला लावणार या भितीनी मोरेश्वरची बायको तुरंगात त्याला भेटायला जाते.
शिपायाची गया-वाया करुन ते स्वामी दर्शन घडवा अशी विनंती करतात.
शिपाई कंटाळून त्यांची इच्छा पूर्ण करवतो.
मोरेश्वर स्वामींची करुणा भाकतो.
स्वामी रागावतात:- "मोरेश्वरा तु पैसा कमावत नव्हता, लुबाडत होता. "
"अरे जगातल्या न्याय मंदिरात सुटला तरी परमेश्वराच्या न्याय मंदिरातुन कसा सुटणार? "
"अरे तिथे तर एक-एक पैश्याचा आणी तो प्राप्त करण्यासाठी केलेल्या कर्मांचा हिशोब द्यावा लागतो."
"अरे तुला काय कमी होती? अरे धन, हे तर आहेत्या जन्मापुर्तेच असते, "
"धन पुढच्या जन्मात नेता येत नाही पण धन मिळवण्यासाठी
केलेले वाईट कर्म मात्र पुढच्या जन्मात भोगावे लागतात."
"अरे धन जोडायचे तर सत्कर्माचे जोडा ते जन्मो-जन्मी तुम्हाला साथ देणार."
"तुझ्या वाईट वर्तनाचा तुझ्या मुलावर पहा काय परिणाम पडला आहे, तोही तुझ्या सारखा दुराचारी व्हायला निघाला आहे."
"तुझ्या त्याला लाख समझाव तो ऐकणार नाही कारण तु स्वताच वाईट कर्म करतो."
"अरे कुणाला उपदेशकरण्या आधी आपण स्वत: त्या लायकीचे असायला हवे, नाहीतर कोणीही किम्मत देणार नाही."
मोरेश्वर शरणागती पतकारतो. स्वामींची करुणा भाकतो.
स्वामी म्हणतात:- "आम्ही तुला सोडवू पण ज्याचे जे-जे लुबाडले आहे ते त्यांना परत कर. तुझ्या मुलाला परत कसं ताळ्यावर
आणायचे ते ही पाहु.
मोरेश्वर प्रामाणिक पणे कबुली देतो आणी स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे चालायचे वचन देतो.